ETV Bharat / state

ATS Raid On PFI विशेष एटीएस कोर्टाकडून पीएफआय प्रकरणात एटीएसला आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

author img

By

Published : Dec 17, 2022, 6:38 PM IST

Special Court Mumbai
मुंबई सत्र न्यायालय

देशभरात पीएफआय ( ATS Raid On Popular Front of India ) या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. पीएफआयच्या राज्यातील अनेक कार्यालयावर एटीएसने छापेमारी केली होती. याप्रकरणी एटीएसने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) न्यायालयात आरोपपत्र दाखल ( Charge Sheet ) करण्यासाठी 90 दिवसाची मुदतवाढ मागितली होती. मात्र न्यायालयाने एटीएसला 30 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. पकडलेल्या आरोपींकडून काही महत्वाचे कॉल रेकॉर्ड हाती लागले असून त्याचा तपास करण्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यास एटीएसने न्यायालयाकडे वेळ मागितला होता.

मुंबई - भारतात बंदी असलेल्या पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( Popular Front of India ) या संघटनेच्या पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) मुंबई सत्र न्यायालयातील ( Special Court Mumbai ) विशेष कोर्टात केली होती. विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एटीएसला ( Special Court Extends Time For Submit Charge Sheet ) 30 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.

एटीएसने मागितली आणखी 90 दिवसाची मुदत एटीएसच्या ( Maharashtra Anti Terrorism Squad ) वतीने आरोपींजवळून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तसेच कॉल रेकॉर्ड देखील तपासात समोर आले आहेत. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसाची मुदत देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे विशेष सत्र न्यायालयात ( Special Court Extends Time For Submit Charge Sheet ) एटीएसकडून करण्यात आली होती.

आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी करत तपास संस्थेने विशेष न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही प्रगतीपथावर असल्याचे एटीएसने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) विशेष न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून दिली आहे.

एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई या संघटनेच्या संबंधित संशयिताविरोधात एनआयए ( NIA ) आणि एटीएसने ( Maharashtra Anti Terrorism Squad ) संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मुंबईतील मालाड, भिवंडी, कांदिवली, पालघर आणि कुर्ला या परिसरामधून संशयित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मजझर खान, सादिक कुरेशी, असिफ खान, मोहम्मद इकबाल खान आणि मोमीन मिस्त्री या आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्र एटीएसने युएपीए देशविरोधी गतीविधी आणि आयपीसीच्या कलम १२० बी, १२१-ए, १५३-ए आणि यूएपीए कायदा १३(१) अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएस युनिट 10 विक्रोळीच्या वतीने या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यात एनआयएने एटीएसच्या ( Maharashtra Anti Terrorism Squad ) मदतीने पीएफआयच्या ( Popular Front of India ) कार्यालयावर छापे मारले आहेत. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्येही NIA ने छापेमारी केली होती. सेक्टर 23 मधल्या PFI च्या कार्यालयावर NIA ने छापा टाकला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.