ETV Bharat / state

Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

author img

By

Published : Jul 20, 2023, 3:50 PM IST

Updated : Jul 20, 2023, 5:09 PM IST

इर्शाळवाडी गावात बचावासाठी गेलेल्या फायरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवराम धुमणे असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते नवी मुंबईतील अग्निशमन दलात कार्यरत होते.

Irshalgad Landslide
शिवराम धुमणे

शिवराम धुमणे यांना श्रद्धांजली

नवी मुंबई : रायगडच्या कर्जत खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 लोकांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र घटनास्थळावर बचाव कार्यासाठी गेलेल्या नवी मुंबईतील अग्निशमन केंद्रातील अधिकारी शिवराम धुमणे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारावरही सरकार खर्च करत आहे.

धाप लागून आला हृदयविकाराचा झटका : इर्शाळवाडी येथे सहा किलोमीटर अंतरावर एक वाडी आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्याने वर जावे लागते. सततच्या पावसात डोंगरावर चढत असताना अग्निशमन दलाचे जवान शिवराम धुमणे (५२) यांना हृदयविकाराचा झटका आला. इतर जवानांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शिवराम धुमणे यांना मृत घोषित केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष दर्गीबाडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. धुमणे नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर अग्निशमन केंद्रात सहाय्यक स्थानक अधिकारी होते.

मृत्यूची चौकशी करण्यात येईल : शिवराम धुमणे यांच्या अकाली निधनाबद्दल NMMC च्या अग्निशमन दलाने शोक व्यक्त केला. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, शिवराम धुमणे यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. लकरच त्याबाबत माहिती मिळेल असे ते म्हणाले.

मदत पोहण्यासाठी अडचणी : इर्शाळवाडीत पावसामुळे बचाव कार्यात पथकाला अनेक अडचणी येत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाचा घटनास्थळी जाताना मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस, दाट धुक्यामुळे घटनास्थळी मदत पोहण्यासाठी अडचणी येत आहेत. 19 जुलै रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, पाताळगंगा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हेही वाचा - Landslide Incidents Maharashtra: इरशाळवाडीसारख्या महाराष्ट्रात किती घडल्या आहेत दुर्घटना? माळीणची आजही अनेकांनाआठवण

Last Updated :Jul 20, 2023, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.