ETV Bharat / state

Corona Patient Increased In Mumbai: मुंबईत फेब्रुवारीच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत 26 पट वाढ

author img

By

Published : Apr 16, 2023, 10:14 PM IST

Corona Patient Increased In Mumbai
कोरोना चाचणी

मुंबईमध्ये मार्चपासून कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून रुग्ण शोधणे त्यांच्यावर उपचार करणे यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून संशयित रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. फेब्रुवारी महिन्या इतक्याच चाचण्या आजही केल्या जात आहेत. त्यामधून २६ पटीहून अधिक रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.

मुंबई: कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. जितक्या चाचण्या अधिक तितके रुग्ण अधिक, चाचण्या कमी केल्यास रुग्णसंख्या कमी होते. मुंबईमध्ये मागील वर्षापर्यंत ६ ते ७ हजाराहून अधिक चाचण्या केल्या जात होत्या. कोरोना आटोक्यात आल्याने चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. आता सध्या १३०० ते १७०० चाचण्या केल्या जात आहेत. यामधून २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना आटोक्यात असताना १ जानेवारी २०२३ ला २२०९ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून ४ रुग्ण आढळून आले. त्यानंतर चाचण्या कमी करण्यात आल्या.


२६ पटीने रुग्ण वाढले: २६ फेब्रुवारी रोजी १२१३ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून १२, २७ फेब्रुवारीला १२८२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून २, २८ फेब्रुवारीला १८१९ चाचण्यांमधून १० रुग्ण आढळून आले होते. १ मार्चला १४८५ चाचण्यांमधून ८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली. १५ मार्चला १८१२ चाचण्यांमधून ३१, १ एप्रिलला १३८७ चाचण्यांमधून १८९ तर १५ एप्रिलला १७६५ चाचण्यांमधून २६६ रुग्ण आढळून आले आहेत. २८ फेब्रुवारीला १० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात १५ एप्रिल रोजी २६६ म्हणजे सुमारे २६ पटीहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.


चाचण्या वाढवण्याचे आदेश: कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेतला तर त्याचा प्रसार रोखणे शक्य होते. रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी. रुग्णालयात ज्यांची ऑपरेशन केली जाणार आहेत अशा रुग्णांच्या चाचण्या करण्यात याव्यात. जर एखादा रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला तर त्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलावी. तसेच चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी खासगी लॅबच्या संचालकांची बैठक आयोजित करावी, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी 'या' उपाययोजना:
- खबरदारी म्हणून ६० वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावावा.
- महानगरपालिका रुग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण, अभ्यागत यांना मास्क लावणे सक्तीचे
- सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावावा.
- गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करणार.

हेही वाचा: Vajramuth Sabha : भाजपचे हिंदुत्व गोमुत्रधारी, उद्धव ठाकरेंची भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.