ETV Bharat / state

Corona Update - राज्यात 3 हजार 187 नवे रुग्ण, 49 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 29, 2021, 10:12 PM IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी 29 सप्टेंबरला 3 हजार 187 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

c
c

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी 29 सप्टेंबरला 3 हजार 187 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 49 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

36 हजार 675 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 3 हजार 187 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 47 हजार 793 वर पोहचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 11 वर पोहोचला आहे. आज 3 हजार 254 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 68 हजार 530 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.26 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 85 लाख 84 हजार 819 नमुन्यांपैकी 65 लाख 47 हजार 793 नमुने म्हणजेच 11.18 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 52 हजार 309 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 36 हजार 675 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यू संख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 75, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276, 26 सप्टेंबरला 3 हजार 292, 27 सप्टेंबरला 2 हजार 432, 28 सप्टेंबरला 2 हजार 844, 29 सप्टेंबरला 3 हजार 187 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36, 27 सप्टेंबरला 32, 28 सप्टेंबरला 60, 29 सप्टेंबरला 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई महापालिका - 525

कल्याण डोंबिवली पालिका - 97

रायगड - 94

अहमदनगर - 561

पुणे - 341

पुणे पालिका - 200

पिंपरी चिंचवड पालिका - 107

सोलापूर- 170

सातारा - 197

सांगली - 86

हेही वाचा - Marathwada Flood : मराठवाडयात ओला दुष्काळ जाहीर करा, दरेकरांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.