ETV Bharat / state

Monsoon session 2023: मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार बरंच काही लपवत असल्याचा संशय - पृथ्वीराज चव्हाण

author img

By

Published : Jul 26, 2023, 4:21 PM IST

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण

मणिपूरचा मुद्दा फार पुढे निघून गेला आहे. तरीसुद्धा पंतप्रधान यावर काही बोलायला तयार नाहीत. या कारणास्तव आज संसदेमध्ये मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. विरोधकांनी मणिपूरच्या प्रश्नावर एकजूट दाखवत हा ठराव मांडला आहे. परंतु पंतप्रधान मोदी या प्रश्नावर चुप्पी साधून असल्याने, यात काहीतरी लपवत आहेत. असा संशयसुद्धा येत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

माहिती देताना प्रतिनिधी

मुंबई : मणिपूर मधील हिंसाचारच्या मुद्द्यावर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर काहीच बोलत नसल्याने, सभागृहात सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो मंजूर करून घेतल्याने यावर आता मतदान होणार आहे. असे असले तरी पंतप्रधान मोदी मणिपूरच्या प्रश्नावर उघडपणे बोलतील का? असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.



वी द पीपल ऑफ इंडिया : पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी, काल "इंडिया" या शब्दावरून अतिशय बालिशपणाचे आरोप पंतप्रधानांनी विरोधकांवर लावले आहेत. लढाई ही विचारांची असायला हवी. "इंडिया" नावाला कोणाचाही आक्षेप असता कामा नये. प्रत्येक ठिकाणी "इंडिया" हा शब्द वापरला जातो. "वी द पीपल ऑफ इंडिया" असे वारंवार म्हटले जाते. त्या कारणाने विनाकारण काहीतरी मुद्दा उकरून काढायचा हे बरोबर नाही. पंतप्रधानांनी इंडिया या मुद्द्यावर बोलण्याऐवजी मणिपूर या विषयावर बोलणे जास्त सोयीस्कर असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.



आपली पाठ थोपटून घेण्याचे काम : एकीकडे मणिपूरचा मुद्दा धुमसत असताना दुसरीकडे भारत जगात अर्थव्यवस्थेत पाचव्या नंबरवर आल्याने, आपली पाठ थोपटून घेण्याचे काम मोदी सरकार करत आहे. परंतु वास्तविकतेमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दरडोई उत्पन्नामध्ये जगात भारताचा क्रमांक १५० वा आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकसंख्येचा देश असल्याकारणाने, अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असणार यात काही शंका नाही. त्याचबरोबर भारताने प्रगती करायला हवी हे सुद्धा मान्य आहे. परंतु दरडोई उत्पन्नावर देशातील शिक्षण, आरोग्य याची परिस्थिती ठरत असते. परंतु दरडोई उत्पन्नावरसुद्धा मोदी सरकार एक शब्द बोलायला तयार नाही, असे सांगत कशाच्या आधारावर मोदी सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.



सरकारकडून कुठलीही मदत नाही : ज्या पद्धतीच्या घटना मणिपूरमध्ये घडल्या घडत आहेत, त्या घटनेतील पीडित व्यक्तींची सरकारच्या कुठल्याही प्रतिनिधींनी दखल घेतली नाही. ना मुख्यमंत्री भेटायला गेले. नाही सरकारचा एखादा मंत्री त्या पीडित महिलांच्या घरी भेट द्यायला गेला. किंवा कुठला सांत्वन्पर संदेशसुद्धा त्यांना देण्यात आलेला नाही. तिथे तणाव निर्माण झाल्याने अशा घटना घडल्या का? हे सांगायला कोणी तयार नाही. या सर्व प्रकरणामुळे जगामध्ये भारताची मोठ्या प्रमाणामध्ये नाचक्की होत आहे. तर कुकी समाजाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी त्याबद्दल भाष्य करून यामध्ये अधिक तणाव निर्माण करणार नाही. परंतु जे काही सुरू आहे ते फार दुर्दैवी असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.



यापूर्वीही अविश्वास ठराव : आज लोकसभेमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी याबाबत सभागृहात अविश्वास ठराव मांडला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा ठराव मंजूर केला असून, आता या ठरावावर मतदान घेतले जाईल. परंतु अशा पद्धतीचा ठराव २० जुलै २०१८ रोजी, सर्वात अगोदर पहिल्यांदा मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यादरम्यान सरकारच्या बाजूने ३२५ तर विरोधकांना १२६ मते भेटली होती.



हेही वाचा -

  1. Manipur Violence : मणिपूरच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
  2. Prithviraj Chavan On Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावावर भाजपमध्ये एकमत नाही- पृथ्वीराज चव्हाण
  3. Maharashtra Monsoon session 2023: कराड विमानतळाचे फडणवीसांनी सांगितले महत्व; म्हणाले, कोल्हापुरातील पुरावेळी...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.