मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात 407 सायबर गुन्हे दाखल झाले असून 214 व्यक्तींना अटक केली आहे. टिक टॉक व अन्य सोशल माध्यमांवर सध्या महिलांवरील अत्याचार, अॅसिड अटॅक आणि बलात्काराच्या घटनांचे समर्थन करणारे पोस्ट शेअर केले जात आहेत. अशा समाजकंटकांच्या विरोधात सायबर क्राईम नजर ठेवून आहे. अशा विघातक लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
सायबर विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात 407 गुन्हे दाखल, 214 आरोपींना अटक
सध्याच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. काळात राज्यात 407 सायबर गुन्हे दाखल झाले असून 214 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यात 407 सायबर गुन्हे दाखल झाले असून 214 व्यक्तींना अटक केली आहे. टिक टॉक व अन्य सोशल माध्यमांवर सध्या महिलांवरील अत्याचार, अॅसिड अटॅक आणि बलात्काराच्या घटनांचे समर्थन करणारे पोस्ट शेअर केले जात आहेत. अशा समाजकंटकांच्या विरोधात सायबर क्राईम नजर ठेवून आहे. अशा विघातक लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.