ETV Bharat / state

सक्षम प्रतिस्पर्धी नसल्याने नवी मुंबईत महायुतीच्या पारड्यात विजय

author img

By

Published : Oct 25, 2019, 9:49 PM IST

2014 च्या तुलनेत ऐरोली मतदारसंघात 9 टक्के व बेलापूर मतदारसंघात 4 टक्के मतदानाची संख्या घटली. कमी मतदानाचा फायदा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळाला. सक्षम विरोध नसल्याने भाजपच्या पारड्यात यश मिळाले असल्याचे जेष्ठ पत्रकार निलेश पाटील यांनी म्हटले.

भाजपचे विजयी उमेदवार गणेश नाईक यांचा विजयी जल्लोष

मुंबई - ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे काल निकाल हाती आले. निकाल तसे पाहिले तर धक्कादायक नव्हते. कारण दोन्ही मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांसमोर सक्षम व ओळखीचे चेहरे नसल्याने हे यश भाजपच्या पारड्यात पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे विजयी उमेदवार गणेश नाईक यांचा विजयी जल्लोष

हेही वाचा - 'रोहित आणि राम शिंदेंची भेट हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण'

गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली. आमच्यासाठी गणेश नाईक हाच एक पक्ष असे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाईकांच्या पाठीमागे भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांनी राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. त्यामुळे नवी मुंबईत भाजप किंवा शिवसेना उमेदवारी कोणाला देणार यावर जोरदार चर्चा सुरू होती.नवी मुंबईतल्या दोन्ही मतदारसंघात भाजपचे पारडे जड असल्याने ऐरोली व बेलापूर मतदारंसघात भाजपचे उमेदवार उभे करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात कोणतेही विशेष ओळखीचे चेहरे नसल्याने गणेश नाईक यांना 1 लाख 14 हजार 38 मते मिळाली. निलेश बाणखिले व गणेश शिंदे हे चेहेरे जनमाणसात नवीन होते. 75 हजार 448 अधिक मत मिळवून गणेश नाईक ऐरोली मतदारसंघातून विजयी झाले.

बेलापूर मतदारसंघातही मंदा म्हात्रे यांच्या विरोधात विशेष ओळखीचा चेहरा नव्हता. मनसेचे गजानन काळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास अपयशी ठरले. तर अशोक गावडे यांनाही काही वैयक्तिक कारणामुळे मतदारांनी नाकारले. विशेषतः 3 हजार 799 इतकी मते नोटाला मिळाली. बेलापूर मतदारसंघातील मतदारांची नाराजी दिसून आली. 87 हजार 746 मते मंदा म्हात्रे यांना मिळाली. 43 हजार 549 मते अधिक मिळाल्याने मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.

लोकसभेच्या निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आंनद परांजपे यांना 63 हजार 278 मते मिळाली. विजयी उमेदवार राजन विचारे यांना 1 लाख दोन हजार 911 मते मिळाली होती. तुलनेत मंदा म्हात्रे यांनी जरी विजय संपादन केला असला तरी कमी मते मिळाली आहेत.

ऐरोली मतदारसंघातून 2019 लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते आनंद परांजपे यांना 63 हजार 313 मते मिळाली होती. तर राजन विचारे यांना 1 लाख सात हजार 676 मते मिळाली होती. त्यामुळे गणेश नाईक मंदा म्हात्रे यांच्या तुलनेत आपल मताधिक्य टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

खरे पाहता दोन्ही मतदार संघात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. ऐरोली विधानसभा मतदारसंघात 42.51 टक्के इतके मतदान झाले. बेलापूर विधानसभा मतदारसंघात 45.16 टक्के मतदान झाले. 2014 च्या तुलनेत ऐरोली मतदारसंघात 9 टक्के व बेलापूर मतदारसंघात 4 टक्के मतदानाची संख्या घटली. कमी मतदानाचा फायदा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळाला. सक्षम विरोध नसल्याने भाजपच्या पारड्यात यश मिळाले असल्याचे जेष्ठ पत्रकार निलेश पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा - सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, जयंत पाटलांचा भाजपला टोला

Intro:
सक्षम विरोध नसल्याने नवी मुंबईत महायुतीच्या पारड्यात विजय....

नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे काल निकाल हाती आले, निकाल तसे पाहिले तर धक्कादायक नव्हतेंचं याचं कारणं दोन्ही मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारां समोर सक्षम व ओळखीचे चेहरे नसल्याने हे यश भाजपच्या पारड्यात पडले हे स्पष्ट होते.
गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला उतरती कळा लागली, आमच्यासाठी गणेश नाईक हाच एक पक्ष असे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाईकांच्या पाठीमागे भाजपा मध्ये प्रवेश केला. नाईक यांनी राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. त्यामुळे नवी मुंबईत भाजप किंवा शिवसेनेच्या कोणत्या उमेदवारी देणार यावर जोरदार चर्चाही सुरू होती.नवी मुंबईतल्या दोन्ही मतदार संघात भाजपचं पारडं जड असल्याने ऐरिली व बेलापूर मतदारंसघात भाजपचे उमेदवार उभे करण्यात आले.लोकसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात
कोणतेही विशेष ओळखीचे चेहरे नसल्याने गणेश नाईक यांना 1लाख 14 हजार 38 मते मिळाली
निलेश बाणखिले व गणेश शिंदे हे चेहेरे जनमाणसात नवीन होते हे गणेश नाईक यांच्या पथ्यावरच पडलं. ७५हजार ४४८ अधिक मत मिळवून गणेश नाईक ऐरोली मतदारसंघातून विजयी झाले.
बेलापूर मतदार संघातही मंदा म्हात्रें यांच्या खेरिज विशेष ओळखीचा चेहरा नव्हता, मनसेचे गजानन काळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास अपयशी ठरले तर अशोक गावडे यांनाही काही वैयक्तिक कारणामुळे मतदारांनी नाकारले.विशेषतः ३हजार ७९९ इतकी मते नोटाला मिळाल्याने बेलापूर मतदार संघातील दात्यांची नाराजी दिसून आली. ८७हजार ७४६मते मंदा म्हात्रें यांना मिळाली ४३ हजार ५४९ मते अधिक मिळाल्याने मंदा म्हात्रें या विजयी झाल्या. लोकसभेच्या निवडणूकित बेलापूर मतदारसंघात
आघाडीचे उमेदवार आंनद परांजपे यांना 63 हजार 278 मते मिळाली होती व विजयी उमेदवार राजन विचारे यांना 1लाख2हजार911 मते मिळाली होती, तुलनेत मंदा म्हात्रें यांनी जरी विजय संपादन केला असला तरी मंदा म्हात्रें यांना कमी मते मिळाली आहेत.ऐरोली मतदारसंघातून 2019 लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतं आनंद परांजपे यांना 63 हजार 313 मते मिळाली होती तर
राजन विचारे यांना 1लाख 7 हजार 676 मते मिळाली होती त्यामुळे गणेश नाईक मंदा म्हात्रें यांच्या तुलनेत आपल मताधिक्य टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले.
खरे पाहता दोन्ही मतदार संघात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४२.५१टक्के इतके मतदान झाले व बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४५.१६टक्के मतदान झाले, २०१४च्या तुलनेत ऐरोली मतदार संघात ९% व बेलापूर मतदार संघात ४% मतदानाची संख्या घटली. यातून ३८लाख बेलापूर मधील ५हजार८८२ पैकीं १लाख७४हजार २८४मतदारांनी मतदान केले नाही तर ऐरोली मतदार संघात ४लाख६१हजार३४९मतदारांपैकीं १लाख९६हजार१२८ मतदारांनी मतदान केले नाही. कमी मतदानाचा फायदा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळाला, सक्षम विरोध नसल्याने भाजपच्या पारड्यात यश मिळाले आहे असे नवी मुंबईतील जेष्ठ पत्रकार निलेश पाटील यांनी म्हंटले.



Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.