ETV Bharat / state

Ajit Pawar on Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करू नये - अजित पवार

author img

By

Published : Apr 25, 2023, 4:43 PM IST

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करु नये असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट केले आहे. पोलिसांनी दंडूकशाहीने सर्वेक्षण करु नये, असे अवाहन त्यांनी ट्विटरवरून केले आहे. आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar on Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करू नये - अजित पवार

मुंबई : राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. बारसू, सोलगाव गावात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणापूर्वी कलम 144 लागू करण्यात आले आहे. ग्रामस्थ अजूनही आंदोलन करत आहेत. पोलिस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंबईतील स्थानिकांच्या कुटुंबीयांनाही नोटिसा बजावल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

Ajit Pawar
अजित पवार यांचे ट्विट

प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध : या सर्वेक्षणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह तरुण, महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळी घाला किंवा मारा, आम्ही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. मात्र, स्थानिकांच्या विरोधात पोलिस बळाचा वापर केला जात आहे.

बळाचा वापर करू नये : याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून सरकारला आवाहन केले आहे. राज्यात उष्णतेची लाट उसळली आहे. खारघरच्या घटनेत आपण आधीच काही लोक गमावले आहेत. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

मातोश्रीवर बैठक सुरू : बारसू येथील प्रकल्पांना महिलांचा तीव्र विरोध आहे. पर्यावरण, पर्यावरणाची हानी याबाबत महिला अधिक जागरूक आहेत. त्यामुळे महिला प्रकल्पाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. जालियनवाला बागेसारखे हे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदार-खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर सुरू आहे. या बैठकीत बारसू प्रकरणावर चर्चा होत असून उद्धव ठाकरेही त्यावर आपली भूमिका मांडणार आहेत.

हेही वाचा - Tamannaah and Vijay dinner date : तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची पुन्हा डिनर डेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.