ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : मृत्यूसंख्या किंचित घटली; शनिवारी ४१३० रुग्णांची नोंद तर ६४ बाधितांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 4, 2021, 8:48 PM IST

राज्यात २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४१३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज (शनिवारी) ४ सप्टेंबरला ४१३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल (शुक्रवारी) राज्यात ९२ मृत्यूची नोंद झाली होती. आज त्यात किंचित घट होऊन ६४ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज २,५०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात ५२,०२५ सक्रिय रुग्ण -

राज्यात २,५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४१३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,७०७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४६ लाख ६० हजार ८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८२ हजार ११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २ हजार १९६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,०२५ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - चिमुकली एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरण; बी.पी. ठाकरे ब्लड बॅंक सील

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ४१३
कल्याण डोबिवली पालिका - ११३
रायगड - ८३
पनवेल पालिका - ६८
अहमदनगर - ७३०
पुणे - ५०६
पुणे पालिका - २१८
पिपरी चिंचवड पालिका - १९१
सोलापूर - २९७
सातारा - ३३७
कोल्हापूर - ६७
सांगली - २०९
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ८६
रत्नागिरी - १०४
उस्मानाबाद - ५३
बीड - ७५

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.