Best Employee : मुलाच्या आजारपणात सुटी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला बेस्टचा नारळ, न्यायालयाने दिले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

author img

By

Published : Mar 9, 2023, 2:13 PM IST

Best Employee

मुलाच्या आजारपणात सुटी घेतल्याने बेस्ट कामगाराला कामावरून काढण्याचा निर्णय बेस्टने घेतला. बेस्टच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बेस्टला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : बेस्ट प्रशासनाचा अजबच कारभार समोर आला आहे. बेस्ट कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या आजारपणात सुटी घेतली. परिणामी सलग सुटी पडल्याने बेस्ट प्रशासनाने एका कामगाराला कामावरून काढून टाकले. यादरम्यान, कामगाराच्या मुलाचा देखील अखेर मृत्यु झाला. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्या कामगाराला कामावरून काढून टाकले. न्याय मिळण्यासाठी कामगाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने बेस्टला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.



काय आहे प्रकरण? : बेस्टमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा मुलगा आजारी पडला. त्याच्या मुलावर उपचार सुरू असताना देखील तो दुरूस्त होत नव्हता. घरी पत्नी एकटीच असल्याने या कर्मचाऱ्याला मुलाच्या उपचारासाठी देखभाल करण्यासाठी कामावरून सुटी घ्यावी लागली. या कर्मचाऱ्याने बेस्ट प्रशासनाकडे मुलगा आजरी असल्याने सुटीसाठी विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्याला अधिकची सुटी दिली नाही. कर्मचाऱ्याने सुटी घेतल्यानंतर मुलाच्या तब्येतीची देखभाल करू लागला. दरम्यान, मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कामगाराने त्याची सुटी वाढवली होती. मात्र, बेस्ट प्रशासनाने कोणतीही वैध प्रक्रिया देखील न करता त्याला कामावरून काढून टाकले, असा दावा कामगाराने करत अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

बेस्टने कामावरून काढले : अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी न्यायालयात कामगाराची बाजू मांडली की, कामगाराला नाईलाजाने आपल्या मुलाच्या आजारपणात सुटी घ्यावी लागली. मोठ्या शहरात एकटी आई किती पुरे पडणार संगोपन करण्यात म्हणून आणि कर्तव्य तसेच बापाचे उत्तरदायित्व देखील आहे की मुलाला सेवा देणं देखभालीसाठी वेळ देणे. अखेर, तो मुलगा गंभीर आजारी होऊन मृत्यू पावला. मात्र, बेस्ट प्रशासनाने त्या कामगाराला कामावरून काढून टाकले.

न्याय मिळण्याची केली मागणी : पुढे अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी सांगितले की, कोणता बाप किंवा आई किंवा पालक मुलगा आजारी असताना कामावर अधिक काळ राहील. काही ना काही काळ त्याला किंवा कुणालाही आजार जसा गंभीर असेल तर तसा वेळ द्यावा लागेल. मात्र, या ठिकाणी कामगाराने बेस्ट प्रशासनाला सांगितले, की मुलाची प्रकृती अधिक गंभीर होत आहे. त्याला अधिक सुटी लागणार होती म्हणून त्या कर्मचाऱ्याने सलग 25 दिवस त्याने सुटी घेतली. ह्याच कारणाने कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आले. दरम्यान, ही घटना 2010 मध्ये घडलेली असून त्याला कामाची गरज आहे. तसेच त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केली आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश : याचिकाकर्त्याच्या वकिलांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने बेस्ट प्रशासनाच्या वकिलांना विचारणा केली की, मुलगा आजारी होता, ही सर्व वस्तुस्थिती माहिती होती का? ह्या प्रश्नावर वकिलाची भंबेरी उडाली होती. अखेर, न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा : Pune District Court : तीन वर्षाच्या अपंग मुलाने पोटगीसाठी थेट बापाच्या विरोधात दाखल केली याचिका; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.