ETV Bharat / state

लातूरकरांच्या पाण्यासाठीच लढणार - राजा मणियार

author img

By

Published : Sep 27, 2019, 5:12 PM IST

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत लातुरमधील दोघांना उमेदवारी देण्यात आली. लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले राजा मणियार तर औसा मतदार संघात सुधीर पोतदार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी पत्रकार परिषद

लातूर - लातूर शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हाच मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे राजा मणियार यांनी स्पष्ट केले.

राजा मणियार आणि सुधीर पोतदार निवडणुकीच्या रिंगणात
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत लातुरमधील दोघांना उमेदवारी देण्यात आली. लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले राजा मणियार तर औसा मतदार संघात सुधीर पोतदार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.


भारतीय बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीतून वंचितमध्ये दाखल झालेले राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
लातूर शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. महिन्यातून केवळ दोनदा पाणीपुरवठा केला जातो. लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे भाजप आणि काँग्रेसकडून फक्त आमिष दाखवले जाते. मांजरा धरणाच्या पाण्याचा उपयोग ऊसाच्या शेतीसाठी केला जातो. असे सांगत त्यांनी अमित देशमुख यांना टोला लगावला.

हेही वाचा - महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशिर्वाद?


काँग्रेस आणि भाजप यांचे संगनमत आहे. त्यामुळेच सर्वसाधारण सभेत आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या कामाचे कौतुक करत सत्काराचा प्रस्ताव मंजूर केला, असा आरोप मणियार यांनी केला.
शहर मतदार संघात मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, एमआयएम वंचितमधून बाहेर पडल्याने हेतू साध्य होतो की नाही याबाबत संभ्रम आहे.

Intro:बाईट : राजा मणियार ( उमेदवार)

वंचितचा मुद्दाही उजनीच्या पाण्याचाच; एमआयएम दुरावल्याने मात्र मरगळ
लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्याच यादीत लातुरातील दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहरमधून राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले राजा मणियार तर औसा मतदार संघात सुधीर पोतदार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. लातूर शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून हाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे लातूर शहराचे उमेदवार राजा मणियार यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे एमआयएम वंचितपासून दूर झाल्यापासून एक प्रकारची मरगळ आल्याचे दिसून येत आहे.
Body:वंचित बहुजन आघाडीकडून पहिली यादी जाहीर केली असून भारीपचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांची चर्चा असताना राष्ट्रवाडीतून वंचितमध्ये दाखल झालेले राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. लातूर शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. महिन्याकाठी केवळ दोनदा पाणीपुरवठा केला जात आहे. उजनीच्या पाण्याचे भाजपा आणि काँग्रेसकडून केवळ आमिष दाखविले जात आहे. प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून या उजनीच्या पाण्याचे गाजर दाखविले जात आहे. मांजरा धरण परिसरातील उसाच्या शेतीला पाण्याचा वापर केला जात असल्याचे सांगत त्यांनी अमित देशमुख यांना टोला लगावला. तर काँग्रेस आणि भाजपा यांचीच मिलिबगत असल्याचाही आरोप मणियार यांनी केला. त्यामुळेच सर्वसाधारण सभेत आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या कामाचे कौतुक करीत सत्काराचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, या परिषदेला एमआयएम च्या कार्यकर्त्यांची अनुपस्थित ही वंचितमध्ये मरगळ आल्याचे चित्र दाखवून देत होती. शहर मतदार संघात मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या सर्वाधिक प्रमाणात आहे. Conclusion:त्याअनुषंगाने राजा मणियार यांना उमेदवार देण्यात आली होती मात्र, एमआयएम दुरावल्याने हा हेतू साध्य होतो की नाही याबाबत संभ्रमता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.