ETV Bharat / state

डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आमदार संभाजी पाटील निलंगेकर

author img

By

Published : Jul 10, 2020, 9:29 PM IST

येणार्‍या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजटल शाळेच्या माध्यमातून अधिकारी वर्ग, आरोग्य यंत्रणा व लोक प्रतिनिधींशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू बाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संभाजीराव पाटल निलंगेकर आढावा बैठकीत केले.

Sambhajirao Patil Nilangekar
संभाजीराव पाटील निलंगेकर

निलंगा : कोरोणा विषाणू संसर्ग आता समुह संसर्गाकडे वळाला असून याकरीता ग्रामीण भागातील लोकांमध्ये सतत जनजागृती करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून येणार्‍या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजिटल शाळेच्या माध्यमातून अधिकारी वर्ग, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संभाजी पाटील निलंगेकर आढावा बैठकीत केले.

येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आज माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कोरोना विषाणू बाबत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपाचे युवा नेत अरविंद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब (श्रीकांत) शिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, निलंगा तहसिलदार गणेश जाधव, देवणी तहसिलदार सुरेश घोळवे, शिरुर अनंतपाळ तहसिलदार अतुल जटाळे, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, देवणी मनोत राऊत, शिरुर अनंतपाळ नंदकिशोर शेरखाणे, न. प. मुख्याधिरी मल्लीकार्जन पाटील , आरोग्य अधिकारी डॉ, श्रीनिवास कदम आदि उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग आता शहरी भागातून ग्रामीण भागात आला आहे. याकरीता आता ग्रामीण भागातील भागातील यंत्रणा सुसज्ज करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच या भागातील जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरी भागातील राहणीमान व ग्रामीण भागातील राहणीमानामध्ये भरपूर फरक असतो. त्यामुळे आपल्याला कायमच जनतेशी सुसंवाद साधुन त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या करीता आपल्या विविध योजना अंमलात आणून काम करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच सर्वाची सुरक्षिता ही महत्वाची आहे. सध्या मतदार संघात आपले गाव स्वास्थ्य व सुरक्षा अभियाना अंतर्गत थरर्मल मीटर व ऑक्सीजन मीटरव्दारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी सर्व पदाधिकारी, सरपंच,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,तलाठी, आशाताई व बीएलओ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यात देवणी मधील 23497 , शिरुर अनंतपाळ 5929,व निलंग्यातील 1400 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तणासणी दरम्यान शहरातील व मदनसुरी येथील प्रत्येकी एक रुग्णाची कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर ते दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता आणखी सुक्ष्म पध्दतीने ही तपासणी करण्याच्या सुचना आ. निलंगेकर यांनी केल्या आहे.

कोरोना या आजारापासून भयभीत होण्यापेक्षा त्यापासून वाचण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुबांत एक कोराना योध्दा तयार करणे गरजेचे आहे. याबरोबर कुटुबांतील प्रत्येक सदस्याची रोगप्रतिकाराक शक्ती वाढविण्यासाठी आजीचा बटवा, योगासणे व वनस्पती औषधाचा वापर करणेही गरजेचे असल्या बाबत जनजागृती व प्रसार करणे गरजे असल्याचे सांगितले. कोरोणा विषाणू हा आता आपल्या भागातही समूह संसर्गात आला असून या करीता आरोग्य यंत्रणेही सांगितलेल्या सुचनाचे तंतोत पालन करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच शासना या करीता ठरवून दिलेल्या नियमाचे पालनही काटेकोरपणे करणे गरजे आहे. या करीता प्रथम नागरीकांमध्ये विविध उपाय योजनेतून प्रसिध्दी करुन त्यांच्या नंतर काही ठिकाणी कारवाईही करणे गरजेचे असल्याच्या सूचनाही आ. निलंगेकर यांनी अधिकार्‍यांना केल्या. या बैठकी नंतर माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील कन्टेंनमेंट झोनची पाहणी करुन अधिकार्‍यांना सूचना केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.