ETV Bharat / state

'हमें तो अपनो ने लूटा'...संभाजी पाटलांचा टोला नेमका कुणाला?

author img

By

Published : Nov 22, 2019, 10:03 PM IST

आमदार संभाजी पाटील निलंगेकर

लातूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सत्तांतर घडवून आणले आहे. यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'हमें तो अपनो ने लूटा' असे म्हणत आपल्याच पक्षातील काहींना जबाबदार धरले आहे.

लातूर - महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सत्तांतर घडवून आणले आहे. विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदार संघांपैकी केवळ दोन जागांवर यश मिळाल्यानंतर आता भाजपाला लातूर महापालिकाही गमवावी लागली आहे. यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'हमें तो अपनो ने लूटा' असे म्हणत आपल्याच पक्षातील काहींना जबाबदार धरले आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर

२०१७च्या महापालिका निवडणुकीत सर्व ३६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपला अभुतपुर्व यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळेच उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात भाजपला पराभव स्विकारावा लागला होता. याशिवाय औसा मतदार संघातही संभाजी पाटील आणि अभिमन्यु पवार यांच्यातील शीतयुद्ध जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या चार वर्षात पक्षाच्या संघटनात्मक कामाला तडा गेला असल्यानेच संभाजी पाटील यांनी 'हमें तो अपनो ने लूटा' असे विधान केले असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - भाजपला धक्का..! उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानींच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर विराजमान

दरम्यान, त्यांचे हे विधान काँग्रेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांसाठी होते की, पक्षाअंतर्गत मतभेद असलेल्या आमदार अभिमन्यु पवार यांच्यासाठी याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे राज्यात भाजप सत्तेपासून दूर जाण्याच्या रंगात आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर पक्षाअंतर्गत मतभेद वाढले आहेत. याचा थेट लाभ लातूर जिल्ह्यात काँग्रेसला झाल्याचे चित्र आहे. महापौर-उपमहापौर पदांच्या निवडीनंतर आता जिल्हा परिषदेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यावेळी राजकीय समीकरणे काय राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Intro:बाईट : आ. संभाजी पाटील निलंगेकर

'हमें तो अपनो ने लूटा' संभाजी पाटलांचा टोला कुणाला? राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
लातूर - लातूरच्या महापौर पदाच्या निवडीत अनपेक्षित घटना घडली. भाजपाच्या दोन नगरसेवकांनी चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सत्तांतर घडवून आणले. सहा विधानसभा मतदार संघात केवळ दोन जागेवर यश मिळाल्यानंतर आता भाजपाला महानगरपालिकाही गमवावी लागली आहे. त्यानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपामधील काहींना जबाबदार धरले आहे. यामध्ये 'हमें तो अपनो ने लूटा' असे म्हणत त्यांनी कुणाला टोला लगावला याची विविध अंगाने चर्चा रंगू लागली आहे.
Body:महापौर पदाची निवड भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शुन्य ते थेट ३६ नगरसेवक निवडुन आल्याने भाजपाला अभुतपुर्व यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळेच उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात भाजपाला पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय औसा मतदार संघातही आ. संभाजी पाटील निलंगेकर आणि आ. अभिमन्यु पवार यांच्यातील शीतयुद्ध जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या चार वर्षातील पक्षाचे यश आणि संघटनात्मक काम याला तडा जात असल्याचे दिसत असल्यानेच आ. संभाजी पाटील यांनी 'हमें तो अपनो ने लूटा, जहाँ पाणी कम था' असे विधान केले आहे. त्यामुळे काँग्रेसला मतदान करणाऱ्या नगरसेवकांसाठी होते का पक्षाअंतर्गत मतभेद असलेल्या आ. अभिमन्यु पवार यांच्यासाठी याची चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे राज्यात भाजपा सत्तेपासून दूर आहे आणि स्थानिक पातळीवर अंतर्गत मतभेद वाढले आहे. याचा थेट लाभ आता लातूर जिल्ह्यात काँग्रेसला होत असताना पाहवयास मिळत आहे. Conclusion:महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीनंतर आता जिल्हा परिषदेच्याही निवडी होणार आहेत. त्यावेळी राजकीय समीकरणे काय राहणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.