ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार - अमित देशमुख

author img

By

Published : May 28, 2020, 1:08 PM IST

amit deshmukh
अमित देशमुख

केंद्र सरकारच्या विरोधात 'स्पीक इंडिया' या ऑनलाईन मोहिमेअंतर्गत पालकमंत्री अमित देशमुख हे सोशल मीडियावरून संवाद साधत होते. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मजुरांचे झालेले हाल यावरून देशमुख यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

लातूर - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. योग्य वेळी योग्य पाऊले न उचलल्यामुळे कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय अडचणीत असताना या राष्ट्रीय आपत्तीमध्ये राज्यांना मदत करणे, हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, राज्यांना निधीच मिळत नसेल तर देश चालवायचा कसा? असा सवाल पालकमंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात 'स्पीक इंडिया' या ऑनलाईन मोहिमेअंतर्गत पालकमंत्री अमित देशमुख हे सोशल मीडियावरून संवाद साधत होते. मुळात चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परदेशातून येणाऱ्या नागरिकांची योग्य तपासणी आणि वेळीच उपचार झाले असते, तर ही वेळ नसती. शिवाय राहुल गांधींनी याबाबत सूचना करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानेच देशातील मजूर, शेतकरी आणि इतर घटकांचे हाल झाले होते.

मजुरांची अवस्था पाहून काँग्रेस पक्षानेच त्यांच्या रेल्वे तिकिटांचा खर्च उचलला त्यामुळेच त्यांना स्वगृही परतता आले आहे. लॉकडाऊनचे चार टप्पे झाले तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे उद्योग- व्यवसायांना ब्रेक लागला आहे. सर्व काही सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र, ऐनवेळी केंद्राने हात झटकल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात ही ‘स्पीक इंडिया’ ही मोहीम राबवली जात आहे.

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.