ETV Bharat / state

नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू

author img

By

Published : Oct 3, 2019, 10:56 AM IST

Updated : Oct 3, 2019, 8:09 PM IST

नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला मनाचा शालू

तिरुमल्ला देवस्थानचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी तिरुपतीवरून कोल्हापुरात शालू घेऊन आले होते. स्वतः आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही परंपरा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आज हा मानाचा शालू घेऊन आल्याचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी यांनी सांगितले.

कोल्हापूर - तिरुपती बालाजी संस्थान तिरुमलावरून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठविण्याची एक प्रथा आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडला.

तिरुपतीवरून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू

हेही वाचा - गांधी@१५० : पंतप्रधान मोदी यांनी केली 'ईटीव्ही भारत'च्या गीताची प्रशंसा

यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी तिरुपतीवरुन कोल्हापुरात शालू घेऊन आले होते. ही परंपरा गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही तिला सुरू ठेवण्यासाठी आलो आहोत. तसेच स्वतः आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही परंपरा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आज हा मानाचा शालू घेऊन आल्याचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी यांनी सांगितले.

हेही वाचा - 'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'

देवस्थान समितीकडे सुपूर्त केलेला हा शालू येणाऱ्या काळात नेसवला जाणार आहे. शालू घेऊन आलेल्या तिरुमल्ला देवस्थानच्या सर्वांचे पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिवाय देवी अंबाबाईची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मानसुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. तिरुपतीवरुन अंबाबाई देवीला आलेल्या या आहेराला मोठे महत्व आहे.

हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'

तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला मनाचा शालू 
(फीड मोजोवरून पाठवले आहे)

अँकर : तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मनाचा शालू पाठविण्याची एक प्रथा आहे. तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपरिक रितिरिवाजप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडला. 

व्हीओ 1 : तिरुमल्ला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला. यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे चेअरमन वाय सुब्बारेड्डी तिरुपतीवरुन कोल्हापुरात शालू घेऊन आले होते. स्वतः आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही परंपरा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या असून त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आज हा मानाचा शालू घेऊन आल्याचे चेअरमन वाय सुब्बारेड्डी यांनी सांगितले. 

बाईट :वाय सुब्बारेड्डी, तिरुमल्ला देवस्थान, चेअरमन 


व्हीओ 2 : देवस्थान समितीकडे सुपूर्द केलेला हा शालू येणाऱ्या काळात नेसवला जाणार आहे. शालू घेऊन आलेल्या तिरुमल्ला देवस्थानच्या सर्वांचे पारंपरिक रितिरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिवाय अंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान सुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आला. 

बाईट : महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती 

गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. तिरुपतीवरुन अंबाबाई देवीला आलेल्या या आहेराला मोठं महत्व आहे. 
Last Updated :Oct 3, 2019, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.