जालना - पालक मंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षेत मोठा घोटाळा केल्याचा असल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जालन्यात केला आहे. आरोग्य मंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना? अशा हा कचाट्यात आरोग्य मंत्री अडकला असल्याचा आरोप करत त्यांनी राजेश टोपे यांचे नाव न घेता टीका केली आहे. परीक्षा सेंटर देताना मुंबईच्या मुलांना जालना सेंटर असे कुठे झाले का? तुमचा पालकमंत्री बुद्धू, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी ( Gopichand Padalkar ) उपस्थित केला आहे. न्यासा सारख्या ब्लॅक लिस्टेड कंपनीला आम्ही नाकार दिले. मात्र ब्लॅक लिस्टेट कंपनीला यांनी कंत्राट देवून गोलमाल केला, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.
ज्ञानव्यापी प्रकरणावर बोलताना काशीतील महादेवाचे मंदिर पाडले आणि त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशिद बांधली गेली. तेव्हा मल्हारराव होळकर इंदोर येथून 20 हजार सैनिक घेऊन काशीत पोचले होते. त्या ठिकाणी मशिद पाडून पुन्हा महादेवाचे मंदिर बांधण्यासाठी ते गेले होते, असेही ते यावेळी म्हणाले.