ETV Bharat / state

'हतनूर'चे 36 दरवाजे उघडले; तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Aug 29, 2020, 10:10 PM IST

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने 36 दरवाजातून पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

hatnur dam gates open
हतनूर धरणाचे दरवाजे उघडले

जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी रात्री 8 वाजता हतनूर प्रकल्पाचे 36 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले असून, धरणातून 1 लाख 45 हजार 235 क्युसेक इतका पाणी विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

'हतनूर'चे 36 दरवाजे उघडले

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने हतनूर धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडले जात होते. मात्र, रात्री तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.

हेही वाचा-संततधार पावसामुळे गूळ प्रकल्प ७७ टक्के भरले

तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 72 तासांसाठी नागरिकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.