Kanashi Village भडगावच्या कनाशीत पाळला जातो 365 दिवस श्रावण मास

author img

By

Published : Aug 16, 2022, 7:38 PM IST

Kanashi Village

भडगावच्या कनाशीत पाळला जातो 365 दिवस श्रावण मास Shravan is observed for 365 days. इतकेच नव्हे तर या गावात कोणालाही अंडी, मांसाहार किंवा दारूचे व्यसन No one addicted to egg meat or alcohol नाही. असे म्हणटल्यास आश्चर्य नको वाटायला. होय राज्यातले एकमेव असे जळगाव जिल्ह्यातले कनाशी हे गाव Kanashi Village आहे. चला तर मग जाणुन घेऊया माहिती कनाशी गावा बाबतची.

जळगाव आपल्याला माहिती आहे का एक गाव असे आहे की, त्या गावातील सर्व ग्रामस्थ शाकाहार करत असतील, कुणीही मांसाहार करत नसेल, तसेच या गावात कुणालाही दारुचे व्यसन नाही, सर्व निर्व्यसनी ग्रामस्थ No one addicted to egg meat or alcohol आहेत. हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नाही, महाराष्ट्रातले एकमेव असे गाव जळगाव जिल्ह्यात आहे. भडगाव तालुक्यातील कनाशी असे या गावाचे नाव आहे. या गावात कुणीही मांसाहार करत नाही, ना कुणाला दारुचे व्यसन आहे, सर्वजण शाकाहारी आहेत. एवढेच काय पण या गावात बकरी किंवा कोंबड्याही पाळल्या जात नाही. साधे अंडे सुध्दा या गावात कुणी खात नाही. अशाप्रकारे एक दोन नव्हे तर तब्बल साडेआठशे वर्षांची या गावाची शाकाहाराची परंपरा आहे. म्हणूनच या कनाशी गावात Kanashi Village वर्षातील 365 दिवस श्रावण मास पाळण्याची परंपरा Shravan is observed for 365 days ती आजतागायत जपली जातेय हे विशेष.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना श्री क्षेत्र कनाशी येथील महंत व गावकरी



गावात कोणालाही मांसाहार किंवा दारूचे व्यसन नाही गिरणा नदी काठावर असलेल्या भडगाव तालुक्यातील 5 हजार लोकवस्तीचे हे कनाशी हे गाव. गावात साधारणता १२ व्या शतकात चक्रधर स्वामी आल्याचा इतिहास आहे. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभाव पंथाचे आचार विचार होय, ते येथील संपूर्ण गावकऱ्यांनी स्विकारले आहे. गावात चक्रधर स्वामीचे भव्य असे मंदीर तसेच आश्रम आहे. याठिकाणी देशभरातून महानुभव पंथांचे अनुयायी दर्शनासाठी येत असतात. ज्या दिवसांपासून गावात चक्रधर स्वामी येवून गेले आहे, गावात राहूल गेले आहेत, त्या दिवसांपासून ते आजतागायत या गावात एकही ग्रामस्थ मांसाहार करत नाही, तसेच दारुही पित नाही. तब्बल आठवर्षांपासून संपूर्ण गाव ही शाकाहाराची परंपरा पाळते आहे. एवढेच नाही तर मांसाहाराला कारण असलेले प्राणी म्हणजेच कोंबडी व बकरी सुध्दा या गावात पाळली जात नाही.


चक्रधर स्वामींना माननारे संपूर्ण गाव असल्याने तसेच त्यांच्या विचारांचा पगडा असल्याने या गावातील दुकाने, विकास सोसायटी तसेच दूध डेअरी यांचे नाव सुध्दा चक्रधर स्वामी यांच्याच नावाने आहेत. गावातील प्रत्येक घराघरात पिढ्यांपासून शाकाहाराचे पालन केले जात आहे. याच गावात लग्न करुन आलेल्या सूना जर मांसाहार करत असतील तर, त्यासुध्दा सासरच्या परंपरेनुसार शाकाहारी होवून जातात आणि शाकाहाराचे पालन करतात. एखाद्या आजारावर डॉक्टरांनी सांगितले असेल, तरीही येथील लोक मांसाहार करत नाही. प्रत्यक्षात मांस कसे असते, कसे दिसते, अंडी कशी असतात, ते कसे दिसतात, हे पाहिलेले नसल्याचे जेव्हा येथील ग्रामस्थ सांगतात तेव्हा मात्र नवल वाटल्याशिवाय राहत नाही.



उपवासाचा एखादा दिवस, किंवा श्रावण महिन्यासारखा एखादा महिना आपण मासांहार करत नसू किंवा पाळत असू. मात्र जन्मापासून ते मृत्यूपर्यत संपूर्ण गावच शाकाहाराचे पालन करत असेल आणि संपूर्ण गावात कुणालाही दारुचे व्यसन नसेल, तर असे हे कनाशी गाव राज्यातच नव्हे तर देशातले एकमेव गाव असे, यात शंका नाही. त्यामुळे या छोट्याश्या गावाची राज्यात अनोखी ओळख असून एकच चर्चा आहे.

हेही वाचा Shirdi Sai Darshan सलगच्या सुट्ट्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.