ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती; भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात

author img

By

Published : Aug 9, 2019, 3:49 PM IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज गुरुवारी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, येथील शेकडो घर व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती; भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात

गडचिरोली - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज गुरुवारी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, येथील शेकडो घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती; भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात

इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा नदीला आलेल्या पुराची पाणी पातळी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे भामरागड शहरात काही घर व दुकानातील पाणी कमी झाले आहे. मात्र, अजूनही १० ते १५ घरे आणि दुकाने पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्याने चिखल मोठ्या प्रमाणात घरात व दुकानात आला असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुकानाचे मोठ नुकसान झाले असून शासनाने मदत करावी, अशी मागणी दुकानदार करत आहेत.

छत्तीसगडमधे पावसाने जोर धरला तर पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भामरागडवासी चिंतेत आहेत. पुराचा फटका दरवर्षी भामरागडवासीयांना सहन करावा लागत आहे. पार्लकोटा नदीचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने येथील अनेकांची पुनर्वसनाची मागणी आहे. मात्र नगरपालिका प्रशासन केवळ नोटीस बजावून मोकळे होत असून पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Intro:गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती ; भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात

गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज गुरुवारी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भामरागडमधील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र येथील शेकडो घर व दुकानांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे .Body:इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा नदीला आलेल्या पुराच्या पाणी पातळी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे भामरागड शहरात काही घरा व दुकानातून पाणी उतरल आहे. मात्र अजूनही 10 ते 15 घर आणि दुकान पाण्याखाली आहेत. पुराच्या पाण्याने चिखल मोठ्या प्रमाणात घरात व दुकानात आले. त्यामुळे नागरिकांना मोठ त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुकानाचे मोठ नुकसान झालं आहे

पाणी ओसरायला सुरु झालं असल तरी छत्तीसगडमधे जर पाऊसाने जोर धरला तर पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भामरागडवासी चिंतेत आहे. पुराचा फटका दरवर्षी भामरागड वासियांना सहन करावा लागत आहे. पार्लकोटा नदीचे पाणी घरांमध्ये घुसत असल्याने येथील अनेकांची पुनर्वसनाची मागणी आहे. मात्र नगरपालिका प्रशासन केवळ नोटीस बजावून मोकळे होत असून पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

बाईट- स्थनिक व्यापारी भामरागडConclusion:व्हिज्युअल आणि बाईट- स्थनिक व्यापारी भामरागड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.