ETV Bharat / state

भामरागडमधील पूर ओसरला ; श्रमदानातून स्वच्छतेची कामे सुरू

author img

By

Published : Sep 10, 2019, 12:59 PM IST

श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करताना नागरिक

गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील आठ दिवस भामरागडमधील 70 टक्के घरं पाण्याखाली होती. सध्या भामरागडमधील पूर ओसरू लागला आहे. श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करण्याचे काम स्थानिक नागरिकांनी हाती घेतले

गडचिरोली - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा व पामुल गौतम नदीला पूर आला. त्यामुळे मागील आठ दिवस भामरागडमधील 70 टक्के घरं पाण्याखाली होते. सध्या भामरागडमधील पूर ओसरू लागला आहे. पुरामुळे पर्लकोटा नदी पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करण्याचे काम स्थानिक नागरिकांनी हाती घेतले.

भामरागडमधील पूर ओसरला


यावर्षीच्या मुसळधार पावसाने भामरागडच्या नागरिकांना जेरीस आणले. यामुळे सात वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. गेल्या आठ दिवसांपासून येथील शेकडो घरे पाण्याखाली होती. मात्र, येथील नागरिकांना स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त इतर कोणाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संतात व्यक्त केला.

हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित; भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव


जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हवाई पाहणी करून पूरस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा भामरागडमधील भयावह पूरस्थिती समोर आली. त्यानंतर मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.
संजय सरोवराचे पाणी गोसीखुर्द धरणात आणि गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-चंद्रपूर हे प्रमुख महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आले.

Intro:भामरागडमधील पूर ओसरला ; श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता

गडचिरोली- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम नदीला पूर आला. या दोन्ही नद्यांनी अक्षरशः भामरागडला वेढा घातला. त्यामुळे तब्बल आठ दिवस भामरागडमधील 70 टक्के घरं पाण्याखाली होते. आज भामरागड मधील पूर ओसरू लागला असला तरी पर्लकोटा नदी पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करण्याचे काम स्थानिक नागरिकांच्या हाती घेतले आहे.Body:यावर्षीच्या मुसळधार पावसाने भामरागड वासीयांना अक्षरशः जेरीस आणले. तब्बल सात वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. गेल्या आठ दिवसांपासून येथील शेकडो घरे पाण्याखाली होती. मात्र स्थानिक नागरिकांना स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त इतर कोणाचीही मदत पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हवाई पाहणी करून पूरस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा भामरागडमधील भयावह पूरस्थिती समोर आली.

त्यानंतर मदतीसाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या. आज पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात साचलेली गाळ स्वच्छ करण्याचे काम श्रमदानातून हाती घेण्यात आले. जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली असून सोमवारी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे संजय सरोवराचे पाणी गोसीखुर्द धरणात आणि गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात सोडल्याने जिल्ह्यातील वैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-चंद्रपूर हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग सोमवारी सकाळपासून बंद आहेत.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.