ETV Bharat / state

Ashwini Sonawane Face to Face Interview : शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी गडचिरोलीतील मुलांना शिकण्याची 'अशी' लावली लावली गोडी

author img

By

Published : Feb 12, 2022, 7:04 AM IST

Updated : Feb 18, 2022, 4:30 PM IST

अश्विनी सोनवणे यांच्या अतुलनीय कामाची दखल एनसीईआरटीने ( NCERT recognize Ashwini Sonawane ) घेतली आहे. नुकताच त्यांना त्यांच्या या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कारही ( National award to Ashwini Sonawane ) प्रदान करण्यात आला. त्यांच्या मुलाखतीमधून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती ( Edu initiative by Ashwini Sonawane ) घेऊ.

शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे
शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे

मुंबई- एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांना जर शिक्षा द्यायची असेल तर त्याला गडचिरोलीला पाठविण्याची धमकी दिली जाते. मात्र, अश्विनी सोनवणे यांनी मुलांच्या विकासासाठी स्वतःहून गडचिरोली मागून ( Ashwini Sonawane on Educational experiments ) घेतली. गटशिक्षणाधिकारी म्हणून गडचिरोलीमध्ये त्यांनी तीन वर्ष अतिशय चांगले काम केले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा यामागचा काय हेतू होता.


प्रश्न - तुम्ही स्वतःहून गडचिरोली मागून घेतले. तिथे जाऊन तुम्ही नेमके काय केले? जाण्यामागे तुमचा काय हेतू होता ?

गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे- खरेतर बऱ्याच वेळेला आपल्याकडे करिअर म्हणजे अमेरिकेला जाणे आणि मोठे पैसे कमविणे वाटते. आम्ही अभय बंग यांच्या व्याख्यानाला जायचो. ते म्हणायचे की जिथे गरज असते तेथे काम करणे म्हणजे करिअर असते. हे विचार मनात होते आणि तेव्हाच तत्कालीन सचिव, तावडे शिक्षणमंत्री होते. त्यांनी विचारले की गडचिरोलीत काम करायला ( Educational officer work in Gadchiroli ) कोण तयार आहे. सचिवांनी माझ्यावर जबाबदारी दिली. ती मी आनंदाने स्वीकारली. मी स्वतःहून भामरागडला काम करण्यास निघून गेले.

शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी असे राबविले शैक्षणिक उपक्रम

हेही वाचा-Hijab Controversy : हिजाब गर्ल 'मुस्कान' खानची महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराने घेतली भेट, शोर्याचे केले कौतूक

प्रश्न - भामरागडमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण कसे होते? तुम्हाला त्याची माहिती होती का ? नक्षलग्रस्त भागात गेल्यानंतर तिथे कसं वाटते?

गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे - खरेतर मी मूळची पुण्याची आहे. औरंगाबादपर्यंत फार तर गेले होते. त्यापुढे कधीही अगदी नागपूरला कधीही गेले नव्हते. पहिल्यांदा 2017 ला गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले. तिथे दळणवळणाच्या सोयी नाहीत. जंगलामध्ये शाळा होत्या. अतिशय दुर्गम भागात कमीत-कमी दोन नाले ओलांडली की एक शाळा येते. अशा भागामध्ये काम करताना मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवले की येथे माडीया ही स्थानिक भाषा आहे. आपली पुस्तके मराठीमध्ये आहेत. ही भाषा विद्यार्थ्यांसाठी एकदम परकीय भाषेसारखी ( Books in two languages in Gadchiroli ) होती.

सहा वर्षेपर्यंत माडिया भाषेत असतात. पहिलीला एकदम त्यांचा मराठी भाषेशी संबंध येतो. विदेशी भाषेशी असल्यासारखे होते. त्याचा परिणाम असा व्हायचा, की आमचे दहावीचे निकालसुद्धा तीन, चार व पाच टक्के असे त्या वर्षीच्या लागले. हे पाहिल्यानंतर एक लक्षात आले की त्यांना सगळ्यात आधी मदतीचा हात द्यायला पाहिजे. द्विभाषिक पुस्तके तयार केली पाहिजेत. तो प्रस्ताव शिक्षणमंत्री तावडे यांच्यासमोर मांडला. त्यांनी त्याला मंजुरी दिली. पहिल्यांदा आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पुस्तके तयार झालीत. त्याच्यामध्ये चित्र होती. पर्यावरणाशी संबंधित तिथल्या भागाशी संबंधित कविता होत्या. पहिल्यांदा पहिलीच्या पुस्तकातील खूप चांगला परिणाम झाला. विद्यार्थ्यांना पुस्तके आपली वाटली. पहिला मदतीचा हात आणि दिल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ( Gadchiroli students Educational Growth ) व्हायला लागली.

हेही वाचा-Karnataka Hijab Row : हिजाब वादाचे अमरावतीमध्ये पडसाद, मुस्लिम तरुणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दुसरा होता की तिथे सगळ्या शाळा जंगलात असतात. विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. तर त्यांना सामाजिक गरज असते. कमी पटाच्या शाळा जास्त होत्या. सामाजिककरणासाठी पुणे, मुंबईला समर कॅम्प होतात. मात्र या भागात अशा काही सुविधा नाहीत. वेगवेगळे दिवाळीच्या वेळेला कॅम्प असतात. त्यामुळे मुले एकत्र येतात. तो प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्यावर त्यांनी मंजुरी दिली. दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्यामध्ये विविध प्रकारचे काम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या रेसिडेन्शिअल काम करायचो. विद्यार्थी एकत्रिपणे चित्रपट बघू शकतील व गाणी म्हणू शकतील यासाठी कॅम्पस घेतले. सामाजिक कौशल्य विकसित होतील, असे आम्ही कॅम्स घेतले. त्याचा खूप चांगला परिणाम झाला. आम्ही केवळ दीडशे विद्यार्थ्यांचा कॅम्प केला होता. मात्र, बुधवार हा भामरागडमध्ये आठवडी बाजाराचा दिवस असतो. त्या दिवशी पालक स्वतःहून येऊन आम्हाला आमच्या मुलांना त्यामध्ये सहभागी करून घ्या म्हणून विचारणा करत होते. प्रत्येक पालकाला वाटते मुलगा शिकला पाहिजे. ती जाणीव त्यांच्यामध्ये आता विकसित व्हायला लागलेली आहे.

प्रश्न - नक्षलग्रस्तभागात वातावरण कसे होते? दहशतीचे होते का? तुम्हाला काय वाटायचे? तिथल्या शिक्षणाबद्दल तुम्ही केलेल्या प्रयोगाबद्दल सांगा.

गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे - खरेच नक्षलग्रस्त भागामध्ये काम करत असताना आम्हाला कधी जाणवले ( No Naxalite effect on Edu officer ) नाही. आम्हाला सगळ्यात प्रामुख्याने वाटते की शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्याला विरोध कुठे होऊ शकत नाही. आम्हाला काम करताना कुठेही त्रास झाला नाही. त्याचा काही दुष्परिणाम जाणवला नाही. इतर ठिकाणी काम करतो तसेच आम्ही काम केले. पण इथे काम करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुमच्या फोनला कधीही रेंज नसेल. तुम्हाला दळणवळणासाठी साधने नसतील. फक्त शिक्षकांचे प्रशिक्षण होण्याची गरज आहे. जंगल भागांमध्ये काम करताना शिक्षकांना ध्यान व योगा अशा चांगल्या प्रशिक्षणाची खूप आवश्यकता आहे. तसेच दळणवळणाच्या सोयी एवढ्या इंटिरियर भागांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे जाण्या-येण्याचा खूप त्रास होतो. पण त्या झाल्या तर नक्कीच त्या भागाचा विकास होईल.

हेही वाचा-Hijab and Burqa in Bollywood :दीपिका पदुकोण ते आलिया भट्टपर्यंत चित्रपटात 'बुरखा' परिधान करणाऱ्या अभिनेत्री!!

प्रश्न - शिक्षण गेले, मुले शिकली, शहाणी झाली तर आपल्या चळवळीला विरोध होईल, असे वाटून नक्षलग्रस्त भागात तुमच्यावर दडपण किंवा थोपवण्याचा प्रयत्न केला. असे काही घडले का ?

गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे - नाही असा कुठे घडले नाही. उलट अशी काही चळवळ आहे हे जाणवले नाही. उलट पालक स्वतःहून पुढे यायचे. आम्ही आर्थिक मदत करू शकत नाही. काय मदत करू ? असे विचारायचे. शाळा समितीचे सदस्य होते. स्वयंपाक करायला मदत करायचे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले. वॉल कंपाऊंड करून दिले. खूप जणांनी चांगले काम केले. आपल्याला 100 टक्के सहकार्य मिळते. कुठेही अडचण जाणवली नाही.

प्रश्न - सध्या तुम्ही भोरला आहात. तिथे काय काम सुरू आहे?

गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे - पुण्यामध्ये नोव्हेंबर 21 रोजी आले. तेव्हा कोरोनाचा काळ होता. या काळातून जाताना मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरविते. मुले चिडचिडी होतात. खूप रागीट होतात. यासाठी आम्ही माईंड फुलनेस म्हणजे मनाची सजगता हा ( Mind fullness program in Pune ZP ) उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. मनाची एकाग्रता असेल तर काम चांगले होते. आपण शंभर टक्के आनंदी राहतो. पण अस सहज शक्य नव्हते. इयत्ता पहिली ते सातवीसाठी आम्ही अठरा कृती कार्यक्रम तयार केले आहेत. यासाठी तज्ञ डॉक्टरांची मदत घेतली. त्याचा मला एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम जाणवला. मुलांना कोरोना काळातसुद्धा कृतीपत्रिका देत होतो. ती शंभर टक्के कृतीपत्रिका मुले सोडून देत होती. त्याचबरोबर हा प्रकल्प सुरू झाला. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांनाही हा उपक्रम आवडला. त्यानंतर हा प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू करण्यात आला. त्याचा चांगला फायदा. परिणाम दिसून आला.

अश्विनी सोनवणे यांच्या अतुलनीय कामाची दखल एनसीईआरटीने घेतली आहे. नुकताच त्यांना त्यांच्या या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला. अश्विनी सोनवणे यांच्या पुढील कार्याला ईटीव्ही भारतच्या शुभेच्छा.

Last Updated : Feb 18, 2022, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.