ETV Bharat / state

भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती राहण्याची शक्यता; दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा तुटतो संपर्क

author img

By

Published : Jun 25, 2020, 6:11 PM IST

Updated : Jun 25, 2020, 9:28 PM IST

bhamragad-tehsil-might-get-disconnected-due-to-flood-even-in-this-monsoon
भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती कायम

भामरागड तालुक्यातील १२८ गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयातून महाराष्ट्र राज्यात कुठेही जायचे असल्यास भामरागड-आलापल्ली हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, पावसाळ्यात भामरागडवरून आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदी व भांडीया नदीच्या कमी उंचाच्या पुलामुळे नेहमी पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे भांडीया नदीमुळे १२८ गावांचा संपर्क तुटतो

गडचिरोली - गतवर्षी पुरामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा तब्बल सातवेळा जगाशी संपर्क तुटला होता. पुरामुळे भामरागड शहराला अक्षरशः बेटाचे स्वरूप आले होते. यावर्षी ही समस्या सुटेल, अशी अपेक्षा असताना नव्या पुलाच्या बांधकामाचा मुहूर्तच सापडला नाही. परिणामी मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने भामरागड लगतची पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भामरागडवासियांना यावर्षीही पुरामुळे वनवास सोसावा लागणार आहे.

गेल्या पावसाळ्यात भामरागड तालुक्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. या पुराची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भामरागड-आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदीवर ८०० कोटीच्या नव्या पूल बांधकामाला मंजुरी दिली. यावर्षीच्या उन्हाळ्यात पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बांधकामाचा साधा मुहूर्तही निघालेला नाही. भामरागड-आलापल्ली मार्गावर तालुका सीमा दर्शवणारी भांडीया नदी व भामरागड गावालागत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवर अतिशय ठेंगणा पुल आहे. कमी उंचीच्या पुलाची समस्या सुटणार, यावर्षी नवीन पुलाचे बंधकाम सुरू होणार, असे तालुकावासीयांच्या वाटत होते. मात्र, भामरागडच्या विकास कामाला "नकटीचा लग्नाला सत्राशे विघ्न" असाच प्रकार घडला. नवीन पुलाचे बांधकाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र, वनविभागाने काम अडविल्यानंतर तोडगा निघणार, असे वाटत असताना लॉकडाऊनच्या समस्येमुळे या दोन्ही पुलांची समस्या सध्यातरी कायम आहे.

bhamragad-tehsil-might-get-disconnected-due-to-flood-even-in-this-monsoon
भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती कायम
भामरागड तालुक्यातील १२८ गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयातून महाराष्ट्र राज्यात कुठेही जायचे असल्यास भामरागड-आलापल्ली हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, पावसाळ्यात भामरागडवरून आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदी व भांडीया नदीच्या कमी उंचाच्या पुलामुळे नेहमी पुलावरून पाणी वाहत असते. भांडीया नदीमुळे १२८ गावांचा संपर्क तुटतो, तर पर्लकोटा नदीला पूर आल्यास जवळपास ८० गावांचा संपर्क तुटतो. परिणामी नागरिकांना आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्वाचा सुविधांपासून वंचित राहावे लागते. भांडीया नदीच्या पुरामुळे गडचिरोलीच्या दवाखान्यात एखादा मरण पावल्यास त्याचे प्रेतही गावात पोहोचू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या दोन दशकांपासून या दोन नद्यांवर उंच पूल बांधण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे शासन व प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. यावर्षी पुलाचे काम सुरू होणार होते. मात्र, विनापरवानगीने काम सुरू केले असे म्हणत वनविभागाने काम अडविले. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे. पुनर्वसनाचा प्रश्नही अद्याप मार्गी लागला नाही. पुरापासून नागरिकांच्या बचावासाठी भामरागडमध्ये तेवढी सुविधाही नाही. त्यामुळे भामरागडवासियांना यावर्षीही नरकयातना सहन कराव्या लागणार आहेत.
भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती कायम
हा पूल निर्माण झाला तरी फक्त जाण्यायेण्याची सोय होईल. मात्र, एका बाजूची दुकान चाळ नष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच पुराची समस्या कायम राहणार आहे. गावातील ४०० नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. गोदावरी नदीवर तेलंगाणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा धरणाप्रमाणे ओवरफ्लोचे पाणी रोखण्यासाठी भिंत उभी करुन भामरागड शहर वाचवा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
Last Updated :Jun 25, 2020, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.