ETV Bharat / state

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क ; पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करणारा चमू अडकला

author img

By

Published : Sep 12, 2019, 11:43 AM IST

गडचिरोली जिल्ह्यात चार सप्टेंबरपासून सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. याच काळात छत्तीसगडमध्येही पाऊस झाल्याने भामरागड गावालगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला. पुराचे पाणी भामरागड मध्ये शिरल्याने जवळपास 70 टक्के घरे पाण्याखाली होती. सहा ते सात दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पूर ओसरला.

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क

गडचिरोली - मुसळधार पावसामुळे पुन्हा सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. बुधवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले आहे. सतत सात दिवस भामरागड मधील 70 टक्के घरे पाण्याखाली होती. पूर ओसरताच भामरागडवासीयांना मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांकडून मदत पोहोचवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी चमू पाठवला. मात्र, भामरागड-आलपल्ली मार्ग पुन्हा बंद झाल्याने हा चमू तेथेच अडकला आहे आणि सर्वेक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत

मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क

हेही वाचा - लोकांचे जीव वाचावण्यासाठी नवा मोटार वाहन कायदा, सरकारी तिजोरी भरण्याचा उद्देश नाही - गडकरी

जिल्ह्यात चार सप्टेंबरपासून सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. याच काळात छत्तीसगडमध्येही पाऊस झाल्याने भामरागड गावालगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला. पुराचे पाणी भामरागड मध्ये शिरल्याने जवळपास 70 टक्के घरे पाण्याखाली होती. सहा ते सात दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पूर ओसरला. सकाळच्या सुमारास भामरागड- आलपल्ली मार्ग सुरू झाला. मात्र, काही तास उलटत नाही तोच मुसळधार पाऊस झाल्याने सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

Intro:मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क ; पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करणारी चमू अडकली

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे पुन्हा सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. बुधवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले आहे. सतत सात दिवस भामरागड मधील 70 टक्के घरे पाण्याखाली होती. पूर ओसरताच भामरागडवासीयांना मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांकडून मदत पोहोचवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी चमू पाठवली. मात्र पुन्हा मार्ग बंद झाल्याने सर्वेक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत.Body:चार सप्टेंबरपासून सतत चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. याच काळात छत्तीसगडमध्येही पाऊस झाल्याने भामरागड गावालगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला. पुराचे पाणी भामरागड मध्ये शिरल्याने जवळपास 70 टक्के घरे पाण्याखाली होती. सहा ते सात दिवस पाण्याखाली राहिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पूर ओसरला. सकाळच्या सुमारास भामरागड- आलपल्ली मार्ग सुरू झाला. मात्र काही तास उलटत नाही तोच मुसळधार पाऊस झाल्याने सातव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी विविध सामाजिक संघटनांकडून साहित्य पाठवण्यात येत आहे. काल साहित्याचे अनेक वाहने भामरागड मध्ये पोहोचले. आज महसूल प्रशासनाकडून पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी भामरागडकडे चमू रवाना झाली. मात्र पुन्हा मार्ग बंद झाल्याने अडथळा निर्माण झाला आहे. यावर्षी पर्लकोटा नदीला सातवेळा पूर आल्याने चार वेळा भामरागड गावात पाणी शिरले. पुरामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून भिंत खचली, चूल विझली... होते नव्हते गेले.. तुटून पडला संसार तरी मोडला नाही कणा... अशी म्हणण्याची वेळ भामरागड वासीयांवर आली आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे व बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.