ETV Bharat / state

परतीच्या पावसाने गडचिरोलीत 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

author img

By

Published : Nov 12, 2019, 6:10 PM IST

यावर्षीच्या खरीप हंगामात 1 लाख 77 हजार 881 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती.  पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या परतीच्या पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाली. तसेच वादळाने धान पडल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

परतीच्या पावसाने गडचिरोलीत 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गडचिरोली - यंदा लांबलेल्या परतीच्या पावसाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसाने जिल्ह्यातील 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामधील 16 हजार एकरांवरील पिकांचे 33 टक्क्यांहून जास्त नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका एटापल्ली तालुक्याला बसला आहे.

परतीच्या पावसाने गडचिरोलीत 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यावर्षीच्या खरीप हंगामात 1 लाख 77 हजार 881 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या परतीच्या पावसामुळे शेती उध्वस्त झाली. तसेच वादळाने धान पडल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापसासाही फटका बसला आहे.

सध्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याने यासंबंधी अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आर्थिक मदतीचा निर्णय होण्यास वेळ लागत असल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

नुकसान झालेले तालुकानिहाय क्षेत्र

गडचिरोली 1200 हेक्टर
धानोरा 1322 हेक्टर
चामोर्शी 658 हेक्टर
मुलचेरा 563 हेक्टर
देसाईगंज 571 हेक्टर
आरमोरी 2006 हेक्टर
कुरखेडा 1427 हेक्टर
कोरची 234 हेक्टर
अहेरी 153 हेक्टर
सिरोंचा 103 हेक्टर
एटापल्ली 8218 हेक्टर
भामरागड 17 हेक्टर

Intro:परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गडचिरोली : धान पीक ऐन हातात येण्याच्या स्थितीत असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. पावसाने धान पीक जमीनदोस्त झाले. जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवरील पीकांना पावसाचा फटका बसला. त्यात १६ हजार एकरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान एटापल्ली तालक्यात झाले असून आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे. Body:यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. धानपीक अंतिम टप्प्यात असताना कोणताही रोगराई नव्हता. मात्र ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पाण्यात भिजला. कापलेल्या धानाच्या कळपा बांधितच कुजल्या. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

केवळ धानच नाही तर दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापूस पिकालाही बराच फटका बसला. आता सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविला जाईल. मात्र आर्थिक मदतीचा निर्णय होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.


नुकसान झालेले तालुकानिहाय क्षेत्र
गडचिरोली १२०० हेक्टर
धानोरा १३२२ हेक्टर
चामोर्शी ६५८ हेक्टर
मुलचेरा ५६३ हेक्टर
देसाईगंज ५७१ हेक्टर
आरमोरी २००६ हेक्टर
कुरखेडा १४२७ हेक्टर
कोरची २३४ हेक्टर
अहेरी १५३ हेक्टर
सिरोंचा १०३ हेक्टर
एटापल्ली ८२१८ हेक्टर
भामरागड १७ हेक्टर
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.