ETV Bharat / state

युतीचे पैलवान अंगाला तेल लावून बसलेत, मात्र मैदानात कोणीची नाही - मुख्यमंत्री

author img

By

Published : Oct 9, 2019, 8:30 PM IST

Updated : Oct 9, 2019, 8:48 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांना उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नेर साक्री आणि शिरपूर येथे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर कडाकडून टीका केली.

मुख्यमंत्री

धुळे - राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच हार मानली आहे. त्यामुळे ते बँकॉकला जाऊन बसले आहेत. आमचे पैलवान अंगाला तेल लावून बसले आहेत. मात्र, मैदानात कोणीच नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था 'आधे इधर-आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ' अशी झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर कडाकडून टीका केली.

युतीचे पैलवान अंगाला तेल लावून बसलेत, मात्र मैदानात कोणीची नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांना उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नेर साक्री आणि शिरपूर येथे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीष पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी प्रवेश केला. अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर तालुक्यातून काँग्रेसला खिंडार पडले आहे.

अमरीश पटेल यांच्या रुपाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वंशातील सद्स्य भाजपमध्ये आल्याने मला त्याचा मनस्वी आनंद आहे. शिरपूर विधानसभा मतदार संघाचा विकास अमरीश पटेल यांनी स्वबळावर केला आहे. मात्र, काँग्रेसने अमरिश पटेल यांना कधीही मदत केली नाही. विरोधकांनी तयार केलेला जाहीरनामा पाहिला तर आपण निवडून येणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जगातली सगळी आश्वासन मतदारांना दिली आहेत. फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ एवढेच आआश्वासन देण्याचे बाकी ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या ५ वर्षात भाजपने शिक्षण क्षेत्र, रोजगार, औद्योगिक विकास यासह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पुढील पाच वर्षात तो पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्षात महाराष्ट्र बेरोजगारीमुक्त आणि दुष्काळमुक्त करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित, धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कडाडून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीष पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी प्रवेश केला अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूर तालुक्यातून काँग्रेसला खिंडार पडले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमचे पैलवान अंगाला तेल लावून बसले आहेत मात्र मैदानात कोणीच दिसत नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी वर टीका केली.

Body:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांना उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नेर साक्री आणि शिरपूर येथे मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेले काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शिरपूर येथे पार पडली, याप्रसंगी पर्यटनमंत्री जयकुमार रावल नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीश पटेल आणि धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिरपूर तालुक्यातून काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच हार मानली आहे, म्हणून ते बँकॉकला जाऊन बसले आहे, आमचे पैलवान अंगाला तेल लावून बसले आहेत, मात्र मैदानात समोर कोणीच नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ अशी झाली आहे, अमरीश पटेल यांच्या या रूपाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वंशातील सदस्य भाजपात आल्याने मला त्याचा मनस्वी आनंद आहे, शिरपूर विधानसभा मतदार संघाचा विकास अमरीश पटेल यांनी स्वबळावर केला आहे, मात्र काँग्रेसने अमरिश पटेल यांना कधीही मदत केली नाही, विरोधकांनी तयार केलेला जाहीरनामा पाहिला तर आपण निवडून येणार नाही हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी जगातली सगळी आश्वासन मतदारांना दिली आहेत, फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ एवढेच आआश्वासन देण्याचे बाकी ठेवले आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कडाडून टीका केली. गेल्या पाच वर्षात भाजपने शिक्षण क्षेत्र, रोजगार औद्योगिक विकास यासह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र पुढील पाच वर्षात तो पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्षात महाराष्ट्र बेरोजगारी मुक्ता आणि दुष्काळमुक्त करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.Conclusion:
Last Updated :Oct 9, 2019, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.