ETV Bharat / state

चंद्रपूरची चिंता वाढली; आज 1235 जणांना कोरोना, 13 मृत्यू

author img

By

Published : Apr 14, 2021, 10:58 PM IST

Corona
Corona

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 1235 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 332 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 1235 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची चिंता वाढली आहे. 332 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजवर 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 36 हजार 748वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 28 हजार 780 झाली आहे. सध्या 7439 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 69 हजार 973 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज झालेल्या मृतांमध्ये…

आज (14 एप्रिल) मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तसेच श्रीराम वार्ड येथील 70 वर्षीय महिला, झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय पुरुष, बामनी बुधोली बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, मूऊ येथील 46 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील 45 वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 55 वर्षीय महिला, जिवती येथील 45 वर्षीय महिला, अहेरी येथील 60 वर्षीय महिला, जुमाठा वार्ड वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, केमिकल वार्ड, घुग्गुस येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 529 बाधितांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 483, तेलंगाणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा 1 आणि वर्धा येथील 1 बाधिताचा समावेश आहे.

आज कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये…

आज बाधित आलेल्या 1235 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 87, बल्लारपूर 83, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 98, नागभिड 39, सिंदेवाही 23, मूल 22, सावली आठ , पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजुरा 30, चिमूर 152, वरोरा 219, कोरपना 23, जीवती 17 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.