ETV Bharat / state

Farmer Suicide : धक्कादायक! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Dec 22, 2022, 7:12 PM IST

Farmer Suicide
प्रतिकात्मक

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांची दैन्यावस्था आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे (Due to indebtedness) आत्महत्याचा आकडा वाढतोय. तालुक्यातील ग्राम जामठी येथील शेतकरी कैलास विश्वनाथ तायडे (Kailas Vishwanath Taide) यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा (Farmer Suicide) संपवल्याची घटना समोर आली. (farmer ended his life journey by hanging himself )

बुलडाणा : शेतकरी कैलास तायडे (Kailas Vishwanath Taide) यांच्या नावावर शेकापूर शिवारात 3 एकर शेती आहे. त्यांनी एका खाजगी पत संस्थेकडून 2 लाखाचे कर्ज घेतले होते. मागील काही दिवसांपासून ते कर्जापायी त्रस्त होते. अशातच त्यांनी टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व शवविच्छेदनासाठी धाड ग्रामीण रुग्णालय येथे त्यांचे प्रेत पाठवले. याप्रकरणी धाड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. जामठी परिसरात या शेतकरी आत्महत्या मुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (farmer ended his life journey by hanging himself )

शेतकऱ्यांची दैन्यावस्था : सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने शेतकऱ्यांची दैन्यावस्था आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे (Due to indebtedness) आत्महत्याचा आकडा वाढतोय. तालुक्यातील ग्राम जामठी येथील शेतकरी कैलास विश्वनाथ तायडे (Kailas Vishwanath Taide) यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा (Farmer Suicide) संपवल्याची घटना समोर आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.