ETV Bharat / state

Teacher death in Car Accident: कार 200 फूट खोल दरीत कोसळल्याने शिक्षकाचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

author img

By

Published : Mar 6, 2023, 4:00 PM IST

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या शिक्षकाचा कारवरील ताबा सुटून कार २०० फूट दरीत कोसळल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली पत्नी गंभीर जखमी झाली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीच्या बीडसांगवी गावाजवळील घाटात आज‌ सकाळी 7.00 वाजण्याच्या सुमा्रास हा अपघात झाला. अंबादास पांडुरंग उगले (वय 46 वर्षे) असे अपघातातील मृत शिक्षकाचे नाव आहे.

Teacher death in Car Accident
अपघातात शिक्षकाचा मृत्यू

बीड: अंबादास पांडुरंग उगले हे बीडच्या गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा अंबादास उगले (वय 40 वर्षे) यांच्यासह कारने (क्रमांक MH-23 AD-0249) निघाले होते. बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. या अगोदरही याच ठिकाणी बीड येथील व्यापारी असलेले तीन भाऊ गाडी दरीत कोसळल्याने अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक छोटे-मोठे अपघात या घाटामध्ये होत राहिले. त्याचबरोबर या घाटाला कठडे नसल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे अपघात टाळण्यासाठी प्रशासन याच्यावर योग्य ती कार्यवाही करेल का...? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

जखमी महिला रुग्णालयात दाखल: हा अपघात एवढा भीषण होता की गाडीने चार ते पाच पलट्या खाल्ल्याने व खोल दरीत कोसळल्याने चालक असलेले अंबादास उगले यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. या अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली.

‘बांधकाम’च्या निष्काळजीपणाचा बळी: कडा-केरूळ-बीडसांगवी ते गहिनीनाथगड या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम करत असताना सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या थराचे काम करण्यात न आल्याने या मार्गावर नियमित अपघात होतात. तसेच काम करतेवेळी घाटाच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आली नसून संरक्षक कठडेही लावण्यात आलेले नाहीत. या घाटाचा उतार तीव्र असल्याने चालकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा बळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा असल्याची चर्चा परिसरातील गावांमधून होत आहे. घाटात संरक्षण कठडे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: Sanjay Shirsat on Aurangzeb grave : औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवा, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.