ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

author img

By

Published : Sep 6, 2019, 4:06 PM IST

अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर

आज सकाळी 11 वाजेपर्यंत नळ दमयंती धरणाचा जलसाठा तब्बल 94 टक्क्यांपर्यंत पोचला होता. प्रशासनाकडून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती - मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या पातळीत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत धरणाचा जलसाठा तब्बल 94 टक्क्यांपर्यंत पोचला होता. कोणत्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर

प्रशासनाकडून अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांतील नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून या धरणात केवळ 50 टक्के जलसाठा होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, यावर्षी पुरेसा साठा असल्याने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटला आहे.

Intro:अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर
धरणाचे गेट कोणत्याही क्षणी उघडन्याची शक्यता

अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती म्हणून नाव असलेलं मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या पातळीत दररोज झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळी11 वाजता या धरणाचा जलसाठा तब्बल 94 टक्के झाला होता त्यामुळे अमरावती,वर्धा,चंद्रपूर व यवतमाळ येथील चार जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर तश्या नोटिसाही प्रशासनाने गावकऱ्यांना दिल्या कारणं कोणत्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडू शकते.

गेल्या दोन वर्षापासून या धरणात केवळ 50 टक्के जलसाठा या धरणात होता तर यावर्षी धरणात केवळ 11 टक्के जलसाठा होता .त्यामुळे अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र यावर्षी वर्षभर अमरावती जिल्हाला पाणी टंचाई सोसावी लागणारं नाही,धरणात 94 टक्के जलसाठा आज झाला होता त्यामुळे केव्हाही धरणाचे गेट उघडु शकते, मध्यप्रदेश व सातपूडा जंगलात पाऊस होण्याची शक्यता आहे,धरणाचे गेट उघडनार असल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे,चार जिल्हाना अलर्ट देण्यात आला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.