Navratri 2022 : ७२ वर्षापूर्वी सात नवदुर्गांनी मिळून स्थापन केलेल्या "या" संस्थेचा दैदीप्यमान इतिहास

author img

By

Published : Sep 29, 2022, 2:14 PM IST

navratri 2022

समाजातील विधवा, परित्यक्ता, व्यसनी पती असलेल्या, वंचित आणि दुर्बल घटकातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाच्या संगोपनाची जबाबदारी सबळतेने पार पाडावी. आशा महिलांना समाजासमोर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहायची गरज पडू नये या एकमात्र हेतूने ताराबाई पाध्ये यांनी सन १९५० मध्ये गरीब व गरजू स्त्रियांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यांच्या त्या आधारवड बनल्या आणि यातूनच शारदा उद्योग मंदिराचा पाया रचला ( Glorious History of Sarada Udyog Temple ) गेला.

अमरावती - समाजातील विधवा, परित्यक्ता, व्यसनी पती असलेल्या, वंचित आणि दुर्बल घटकातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाच्या संगोपनाची जबाबदारी सबळतेने पार पाडावी. आशा महिलांना समाजासमोर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहायची गरज पडू नये या एकमात्र हेतूने ताराबाई पाध्ये यांनी सन १९५० मध्ये गरीब व गरजू स्त्रियांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यांच्या त्या आधारवड बनल्या आणि यातूनच शारदा उद्योग मंदिराचा पाया रचला ( Glorious History of Sarada Udyog Temple ) गेला.

शारदा उद्योग मंदिर

कोण होत्या ताराबाई पाध्ये? - 'वऱ्हाडचे नवाब' अनभिषिक्त राजे ,रसिक आणि वकील अशी ओळख असलेले दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे समकालीन व राजकीय चळवळीतील सहकारी होते. मराठी इंग्रजी, उर्दू, हिंदी, संस्कृत आणि गुजराती भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ताराबाई पाध्ये ह्या दादासाहेब खापर्डे यांची नात आणि बाबासाहेब खापर्डे यांची मुलगी. सी.पी.अँड बेरार मध्यप्रांत मंत्रिमंडळात बाबासाहेब खापर्डे हे मंत्री होते. त्यामुळे राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं. पण त्यांचा ओढा राजकारणापेक्षा समाजकारणाकडेच अधिक होता.


अशी रोवल्या गेली शारदा उद्योगाची मुहूर्तमेढ - त्याकाळी महिलांमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसाद झालेला नव्हता पण महिलांमध्ये असलेला पाककला हा गुण फिरून त्याच आधारे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न ताराबाईंनी बघितले आणि शारदा उद्योग मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९५५ मध्ये ताराबाई पाध्ये यांनी समविचारी ६ महिलांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्याकडून आजीवन सदस्यत्वाची ५१ रुपये फी घेऊन ही संस्था सुरू केली. अवघ्या ३५७ रुपयांच्या भांडवलात सुरू केलेल्या या संस्थेची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये एवढी आहे.

पेपर मिंटच्या गोळ्या पासुन उत्पादनाची सुरुवात - अगदी सुरुवातीच्या काळात शिवणकाम व पेपरमिंटच्या च्या गोळ्या बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन करणे व त्याची विक्री करणे अशा कामापासून सुरुवात झाली ( Varieties of products of Sarada Udyog Mandir ) होती. पापडाचे सर्व प्रकार लोणचे कैरीची गोड पदार्थ विविध प्रकारचे मसाले विविध चटण्या विविध धान्यांचे तयार पीठ चविष्ट गोड पदार्थ खारी पदार्थ रुखवताचे पदार्थ व इतर वस्तू या ठिकाणी तयार होतात.

उत्पादने जातात सातासमुद्रा पार - शारदा उद्योग मंदिरात तयार झालेले विविध प्रकारचे उत्पादने खास करून खारे शंकरपाळे, साधी शेव ,मसाला शेव, चकली चिवडा, तळलेला पोह्यांचा चिवडा,करंज्या, अनारसे, बेसन लाडू, रवा बेसन लाडू, दाणे लाडू, तीळ लाडू , तिळाच्या वड्या, चिरोटे, शंकरपाळे, ओल्या नारळाची करंजी या चविष्ट पदार्थांना अमेरिका जर्मनी इंग्लंड यासह अन्य राष्ट्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पाध्ये यांनी ( Selling product in country and abroad ) सांगितले. उद्योग क्षेत्रात मोठी उलाढाल ( Big turnover in industry )आहे.

शहराच्या मध्यवस्तीत डौलदार इमारत - सुरुवातीला खापर्डे वाड्यातच उत्पादन व विक्रीचा हा उद्योग सुरू करण्याचा आला होता. अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष वीर वामनराव जोशी यांच्या सहकार्यामुळे १९५२ मध्ये संस्थेला शहराच्या मध्यवस्तीत जवळपास ३५०० स्वकेअर फुटाची जागा लिजवर मिळाली होती. २००५ मध्ये संस्थेने ही जागा शासनाकडून विकत घेतली. आज संस्थेची शहराच्या मध्यवस्तीत डौलदार इमारत आहे.

रेल्वे स्टेशनवर टी स्टॉल चालविणारी एकमेव महिला संस्था - १९५६ साली मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला भेट दिली आणि संस्थेच्या कामाने ते प्रभावित झाले. त्यांनी बडनेरा येथील रेल्वे स्थानकावर कॅन्टीन सुरू करण्यासंबंधी सुचविले खरे तर शारदा उद्योग समूहासमोर ते मोठे आव्हान होते पण हे आव्हान समर्थपणे पेलून ताराबाईंनी ६२ वर्षांपूर्वीच महिला सक्षमीकरणाचा प्रत्यय आणून दिला. आज संपूर्ण भारतात रेल्वे स्टेशनवर टी स्टॉल चालविणारी एकमेव महिला संस्था म्हणून अमरावतीच्या शारदा उद्योग मंदिराने नाव कमावले आहे. या ठिकाणी गरमागरम चहा तसेच चविष्ट समोसे व कचोरी प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध असते.गेल्या ७२ वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे.

मदत नको काम द्या - मध्य प्रांताचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांनी १९५२ मध्ये संस्थेला भेट दिली. त्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले आणि मध्य प्रांतातर्फे आर्थिक मदत देऊ केली. परंतु 'आम्हाला मदत नको, तर काम द्या ,असे म्हणत मदत स्वीकारण्यास ताराबाईंनी नम्रपणे नकार दिला. तेव्हा संस्थेला ६०० मच्छरदाण्या पुरवण्याची पहिली ऑर्डर त्यांनी संस्थेला दिली.

एक रुपयात चार भाकरी आणि भाजी - १९७० ला वसंतराव नाईक यांनी संस्थेला भेट दिली व इथले काम पाहून त्यांनी संस्थेच्या विस्तारासाठी १५००० रुपयांचा निधी दिला होता. संस्थेने यामधून १९७५ साली 'अन्नपूर्णा' हा विभाग सुरू केला. यातून शहरातील शंभर ते दीडशे महिलांना रोजगार मिळाला. या योजनेचा शुभारंभ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाला होता.


महिला व विद्यार्थिनी वस्तीगृह - नोकरी अथवा अन्य कामासाठी शहरात येणाऱ्या महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी संस्थेने १९७७ ला संस्थेने वस्तीगृह सुरू केले. नोकरीमध्ये घरापासून दूर राहावं लागणार्‍या स्त्रियांना घरासारखा वाटेल असं, ना नफा ना तोटा या तत्त्वावर सगळ्या सुविधा देणारं वस्तीगृह संस्थेने सुरू केलं.

अन्नपूर्णा भोजनालय - संस्थेने १९७५ अन्नपूर्णा भोजनालय सुरू केले. शहरांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्य करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती स्वरूपाच्या शुद्ध सात्विक भोजनाची सोय माफक दरात या ठिकाणी करण्यात आली आहे. येथे भोजनासाठी असलेल्या प्रशस्त हॉलमध्ये एकाच वेळी पन्नास व्यक्ती भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात तसेच जेवणाच्या पार्सल ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या सचिव विनया कांत यांनी दिली

या मान्यवरांनी दिल्या संस्थेला भेटी - डॉ. पंजाबराव देशमुख , माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तत्कालीन राज्यपाल पट्टाभी सितारामय्या, अर्थमंत्री सी.डी. देशमुख, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह डझनभर मान्यवरांनी या संस्थेला आजपर्यंत भेट दिल्या आहेत.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.