ETV Bharat / state

Rain Update : राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस; ग्रामीण अकोल्यात गारा बरसल्या

author img

By

Published : Apr 7, 2023, 4:21 PM IST

Unseasonal Rain
Unseasonal Rain

राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आज दुपारी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. यामध्ये पातुर तालुका, बार्शीटाकळी तालुक्यात गारपीट झाली आहे. दरम्यान, या गारपिटीमुळे कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या गारपीटीने शेतातील संत्रा, लिंबू, कांदा आंबा पिकाला फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस तापमान असताना अचानक झालेल्या या हवामानातील बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अविदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बार्शीठकाळी तालुक्यातील पातूर येथे पंधरवड्यापूर्वी अवकाळी पावसाने कहर केला होता. त्यामुळे हरभरा, गहू, कांदा, आंबा, संत्रा, लिंबू या पिकांचे मोठे नुकसान झाले. या घटनेला पंधरा दिवसही होत नसताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर केला आहे. या दोन तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा खराब हवामानाच्या तडाख्यात आले आहेत.


शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अवकाळी पावसात 15 दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रांना बसला. कामगारांचा संप मागे घेतल्यानंतर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. मात्र, त्या सर्व नुकसानीच्या भरपाईचे आदेश अद्यापही न मिळाल्याने शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आजच्या अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन्ही नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. तूर तालुक्यातील तुळंगा, बार्शीठकाळी या भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले. या गारपिटीमुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात येत आहे.

८ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा : जिल्ह्यात शनिवार, ८ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा प्रादेशिक हमाम नागपूर मंडळाकडून देण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार 8 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात 30 ते 40 मैल प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी. पिके, शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. विक्रीसाठी आणलेला मालही बाजार समितीत सुरक्षित ठेवावा. माल खराब होणार नाही याची काळजी घ्या असे अवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - IPL 2023 : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपले दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.