ETV Bharat / state

Changemakers विज्ञान युगातही मासिक पाळी ठरतेय विटाळ क्षितिज स्वयंसेवी संस्था करत आहे जनजागृती

author img

By

Published : Aug 13, 2022, 11:02 AM IST

Kshitij Swayamsevak Sangh
क्षितिज स्वयंसेवी संस्था करत आहे जनजागृती

महिलांना आजही पुरुष प्रधान संस्कृतीत दुय्यम स्थान आहे. त्यात मासिक पाळीबद्दल अजूनही गैरसमज आहेत. शिवाय याचा परिणाम महिलांना भोगावा लागत आहे. आजही मासिक पाळी Menstrual cycle म्हणजे विटाळ मानला जात आहे. या काळात महिलांना आधार दिला जात नाही. पण क्षितिज स्वयंसेवी संस्था kshitij Vounteer Association याबाबत जनजागृती करत आहे.

अकोला - महिलांना आजही पुरुष प्रधान संस्कृतीत male dominated culture दुय्यम स्थान आहे. तरीही महिला आज जगभरात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांसोबत उभे राहत आहे. परंतु, अशातच महिलांची दर महिन्याला मासिक पाळी Menstrual cycle असतेच. महिलांसाठी ही नित्याची आणि लाजिरवाणी बाब असली तरी त्यांना या काळात धीर, आधार देण्याची गजर आहे. मात्र, 21 व्या शतकातही महिला त्या दिवसांवर बोलण्यास तयार नाहीत किंवा त्यावर चर्चाही कोणी करत नाही.

आजही मासिक पाळी म्हणजे समजतात विटाळ - 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस झाला. भारतात आजही अनेक ठिकाणी मासिक पाळीला विटाळ आणि निषिद्ध मानले जाते. आपल्या देशात याबद्दल प्रचंड मोठे गैरसमज आहेत. जवळपास सगळीकडेच यावर खुलेपणाने बोलणेही टाळले जाते. मात्र, अशा परिस्थितीत स्त्रिला समजून घेण्याची व स्विकारण्याची हिच वेळ असते. परंतु, भारतीय संस्कृतीतील रूढी आणि परंपरा यामुळे महिलांमधील मासिक पाळी आजही कठीण आहे. जेवढी ती आधीच्या काळी होती.

क्षितिज स्वयंसेवी संस्था करते गैरसमज दूर - महिलांना मासिक पाळीच्या दिवसात एकटेच राहण्यास भाग पाडले जाते. हा काळ त्यांना वाळीत टाकण्यासारखाच वाटतो. परंतु, महिलांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी काही महिलांच्या संघटना समोर येत आहेत. महिलांना समाजात स्थान मिळावे, यासाठी काही महिला उभ्या राहिल्या आहेत. अशीच एक क्षितिज स्वयंसेवी संस्था आहे. जी संस्था महिलांसाठी काम करण्यास पुढे आली आहे. क्षितिज स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक संचालक स्नेहल चौधरी कदम या मासिक पाळीच्या संदर्भातील समज-गैरसमज दूर करण्यासाठी विविध कार्यक्रम घेत आहेत. तसेच समाजात जनजागृती करीत आहेत. या संस्थेने समाजामध्ये या विषयावर तज्ञांचीही मदत घेतली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मानसोपचार तज्ञांद्वारेही प्रबोधन केले जाते.

मासिक पाळी म्हणजे नक्की काय? मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे 12-13 व्या वर्षी होते. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपर्यंत किंवा मोनोपॉजपर्यंत म्हणजेच 45-50 या वयापर्यंत हे चक्र सुरु असते.

मासिक पाळी आणि संसर्ग - खेडगावात किंवा ग्रामीण भागात महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही देशातील केवळ 30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात.

हेही वाचा :Small Kidney Stones किडनीतील छोटे दगड मागे राहिल्याने नंतर गुंतागुंत निर्माण होते, अभ्यासात स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.