ETV Bharat / state

Prakash Ambedkar : बेरोजगारांकडून वाढीव फी वसुली थांबवा, 'वंचित'चा राज्य सरकारला इशारा

author img

By

Published : Aug 10, 2023, 8:53 PM IST

Prakash Ambedak
Prakash Ambedak

सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेरोजगारांकडून वाढीव फी वसुली थांबवावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी ( Vanchit Bahujan Yuva Aghadi ) रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेरोजगारांकडून वाढीव फीची वसुली थांबवावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी ( Vanchit Bahujan Yuva Aghadi ) रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी सरकार खासगी कंपन्यांचा वापर करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सुशिक्षित बेरोजगारांना लुटण्याचा प्रकार : आज प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, जिल्हा परिषद थेट सेवा भरतीतून ( Zilla Parishad Recruitment ) बेरोजगारांकडून 900 ते 1000 रुपये फी वसूल करत आहे. त्यामुळे या कंपन्यांना एकूण अडीचशे कोटींचा नफा मिळणार आहे. या कंपनीचा मालक कोण हे आठवडाभरानंतर सांगेल. बेरोजगार तरुणांना लुटण्याचे काम मंत्रिमंडळाकडून केले जात आहे. या कंपनीकडून निधी कसा जमा होणार आहे. याचा खुलासा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी करावा, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दिवसाढवळ्या सुशिक्षित बेरोजगारांना लुटण्याचा हा प्रकार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

...अन्यथा रस्त्यावर उतरणार : आतापर्यंत यूपीएससी, एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी नाममात्र शुल्क आकारले जात होते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांकडून फीस वसूल करावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भीतीचे वातावरण वाढेल, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज पत्रकाराला मारहाण झाली तरी कारवाई होत नाही. देशात भाजप सरकार भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. या भीतीच्या वातावरणात जगायचे की नाही हे 2024 च्या निवडणुकीत नागरिकांना ठरवावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावेळी वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Challenge To Sedition Act : एल्गार परिषद प्रकरणात याचिककर्त्याला नोटीस दिल्याने देशद्रोहाच्या कायद्याला प्रकाश आंबेडकरांनी दिले आव्हान
  2. Prakash Ambedkar On Aurangzeb : औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय? प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न
  3. Prakash Ambedkar : 'वंचित' भाजपसोबत जाणार? प्रकाश आंबेडकरांनी थेटच सांगितले....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.