ETV Bharat / state

धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलीने केला जन्मदात्याचा खून

author img

By

Published : Oct 11, 2019, 1:51 PM IST

Updated : Oct 11, 2019, 4:21 PM IST

संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली

संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागे राहणाऱ्या या कु़टुंबामध्ये रात्री उशिरा हा प्रकार घडला. बाबुराव कंकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, रेश्मा या त्यांच्या मुलीने हे कृत्य केले.

अकोला - संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागे राहणाऱ्या या कु़टुंबामध्ये रात्री उशिरा हा प्रकार घडला. बाबुराव कंकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, रेश्मा या त्यांच्या मुलीने हे कृत्य केले.

संपत्तीच्या वादावरून मुलीने वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील खदान परिसरात घडली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अडीच एकर शेती आणि दोन खोल्यांचे घर, अशी संपत्ती बाबुराव कंकाळ यांच्या नावावर असून, त्यांना एक 22 वर्षांचा मुलगा तसेच रेश्मा नामक मुलगी आहे.

आरोपी रेश्मा बाविस्कर मुंबईत राहते. ती काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांकडे आली होती. बाबुराव व रेश्मा यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मालमत्तेच्या वाटपाबाबत वाद सुरू होता. यानंतर चिडलेल्या रेश्माने घरातील चाकूने वडिलांवर हल्ला चढवला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. हे पाहून मुलाने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले. उपस्थितांनी बाबुराव कंकाळ यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:अकोला - संपत्तीचा वाद किती विकोपाला जाऊ शकतो हे कल्पनेकडील आहे. बऱ्याच वेळा मुलाने संपत्ती साठी आई, वडिलांचा खून केल्याच्या घटना घडल्या. परंतु, अकोल्यातील खदान परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागे राहणाऱ्या घरात संपत्तीसाठी मुलीनेच जन्मदात्या वडिलांची चाकू भोसकून खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली. बाबुराव कंकाल असे दुर्दैवी वडिलांचे नाव असून रेश्मा बाविस्कर हिने हे क्रूरकृत्य केले आहे. Body:बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या अडीच एकर शेती आणि दोन खोल्यांचे घर, अशी संपत्ती बाबुराव कंकाल यांच्याकडे आहे. त्यांना एक 22 वर्षांचा मुलगा आणि रेश्मा मुलगी असा त्यांचा परिवार आहे. रेश्मा बाविस्कर ही मुंबई येथे राहते. ती काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांकडे आली होती. वडील कंकाल आणि रेश्मा यांच्यामध्ये वाद झाला. रात्री उशिरापर्यंत हा वाद सुरू होता. चिडलेल्या रेश्मा ने घरातील चाकू घेवुन वडिलांवर हल्ला चढविला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मुलाने आरडाओरड केली. शेजारी जमा झाले. त्यांनी बाबुराव कंकाल यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वडिलांवर हल्ला करणाऱ्या मुलीला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

बाईट - किरण वानखडे
ठाणेदार, खदान पोलिस स्टेशन, अकोलाConclusion:
Last Updated :Oct 11, 2019, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.