ETV Bharat / state

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'श्रद्धा कायदा' करा, तृप्ती देसाईंची मागणी

author img

By

Published : Dec 28, 2019, 12:16 PM IST

trupti desai Ralegan Siddhi visit
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई

निर्भया प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी यासाठी अण्णा हजारे यांनी २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी अण्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

अहमदनगर - देशातील वाढत्या महिला अत्याचारांबद्दल संताप व्यक्त करीत गुन्हेगारांना तातडीने शिक्षा देण्यात यावी. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रकारे दिशा कायदा मंजूर करण्यात आला. त्याचप्रकारे महाराष्ट्रात कोपर्डीच्या निर्भयाच्या नावाने श्रद्धा कायदा आणावा, अशी मागणी करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सांगितले. त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'श्रद्धा कायदा' करा, तृप्ती देसाईंची मागणी

निर्भया प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी यासाठी अण्णा हजारे यांनी २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी अण्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

अण्णांनी केले भूमाता ब्रिगेडचे कौतुक -

तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णांची भेट घेत आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी अण्णांनी भूमाता ब्रिगेडचे कार्य कौतुकास्पद आणि धाडसी आहे. तसेच त्यांनी महिला अत्याचाराविरोधात जोमाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Intro:अहमदनगर- आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'श्रद्धा कायदा' करा, तृप्ती देसाईंची मागणी. अण्णांची घेतली भेट.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_trupti_meet_anna_vis_7204297

अहमदनगर- आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'श्रद्धा कायदा' करा, तृप्ती देसाईंची मागणी. अण्णांची घेतली भेट.

अहमदनगर-- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी इथे भेट घेऊन अण्णांच्या मौन आंदोलनाला पाठिंबा दिला. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी साठी अण्णांनी 20 डिसेंबर पासून मौन आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी अण्णांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना देसाई यांनी देशातील वाढत्या महिला अत्याचारांबद्दल संताप व्यक्त करत गुन्हेगारांना तातडीने शिक्षेची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी केली. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून आंध्रप्रदेश मधे तेथील राज्य सरकारने ज्या पद्धतीने दिशा कायदा मंजूर केला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कोपर्डीची निर्भयाच्या नावाने श्रद्धा कायदा आणावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अण्णांनी केले भूमाताचे कौतुक-
-तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अण्णांची भेट घेत आंदोलनाची माहिती घेतली. यावेळी अण्णांनी भूमाता ब्रिगेडच्या कार्य कौतुकास्पद आणि धाडसी असून महिला अत्याचारा विरोधात जोमाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात 'श्रद्धा कायदा' करा, तृप्ती देसाईंची मागणी. अण्णांची घेतली भेट.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.