ETV Bharat / state

Ajit Pawar on ByPoll : कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

author img

By

Published : Feb 5, 2023, 9:03 PM IST

Updated : Feb 5, 2023, 10:07 PM IST

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणूका या बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे स्पष्ट केले.

Ajit Pawar on Kasaba Chinchwad ByPoll
विरोधी पक्षनेत अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधतना

विरोधी पक्षनेत अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधतना

अहमदनगर : कसबा आणि पिंपर चिंचवडी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर केले जात आहेत. तर ही पोटनिवडणूक परंपरेनुसार बिनविरोध व्हावी असे देखील सांगितले जात आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असे स्पष्ट विधान केले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके, पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारचा पोटनिवडणूकीत बंदोबस्त करा : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचा बालेकिल्ला उध्वस्त झाल्याने व जनतेचा कौल लक्षात आल्याने या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणखी पुढे ढकलत रडीचा डाव खेळला आहे. महिलांचा सन्मान करा अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी दिली नसून या सरकारचा पुण्याच्या पोटनिवडणुकीत बंदोबस्त करा, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.

राज्य सरकार घटनाबाह्य : अजित पवार पुढे म्हणाले की सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगासमोर खटला चालू असतानाही सत्तेवर आलेले हे सरकार घटनाबाह्य आहे. सध्याचे राज्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे बेताल वक्तव्ये करत महापुरुषांचा अवमान करत आहे. हे सरकार सत्तेवर येऊन अनेक महिने झाले असले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने काही आमदारांनी सूट शिवून घेतले आहे तर काहींनी देवाला मंत्रिपद मिळावे, म्हणून नवस केले आहेत. सध्या त्रेचाळीस जण मंत्री पाहिजे होते, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची यांनी भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था आपण यापूर्वी कधी पहिली नव्हती, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

हिंमत असेल तर राजीनामा द्या : ते पुढे म्हणाले की, सरकार येतात व जातात कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. शिवसेना प्रमुखांनीच आपले वारसदार म्हणून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची नावे जाहीर केली होती. मात्र शिवसेना सोडून ही मंडळी गुवाहाटीला पळून गेली. जे शिवसेना सोडून गेले ते परत निवडून आले नाही हा इतिहास आहे. हिम्मत असेल तर ह्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे.

पंतप्रधानांवर टीका : अजित पवार पुढे म्हणाले की, करोना काळात लोकांचे जीव वाचवण्याचे मोठे काम आम्ही केले. आजपर्यंत अनेक पंतप्रधानांचा कारभार देशाने पहिला मात्र राज्याराज्यात तोडफोड करून सत्ता मिळवणारे मोदी हे पाहिले पंतप्रधान आहेत. तिसगावसह तेहतीस गावांच्या पाणीयोजनेसाठी प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केल्याने या योजनेला मंजुरी देता आली. योजना मंजूर झाली असली तरीही योजना सुरु झाल्यानंतर पाणीपट्टी भरत चला, असे आव्हान त्यांनी केले

मान्यवरांची उपस्थिती : पार्थडी तालुक्यातील तिसगावसह तेहतीस गावांच्या पाणीयोजनेला मंजुरी दिल्याबद्दल पवार व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा लाभार्थी गावातील प्रतिनिधींच्या हस्ते तिसगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके,चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, डॉ. उषाताई तनपुरे, राजेंद्र फाळके,राजेंद्र दळवी, क्षितिज घुले,शिवशंकर राजळे, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ पाटील लवांडे, भगवान दराडे, इलियास शेख, मुनीफा शेख,संगीता गारुडकर, नासिर शेख, बंडू बोरुडे,सीताराम बोरुडे, चांद मणियार हे उपस्थित होते.
हेही वाचा : Jitendra Awhad tweet On Ramayana: रावण काढून रामायणातला राम समजावून सांगा; आव्हाडांचे नवे ट्विट

Last Updated :Feb 5, 2023, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.