ETV Bharat / state

Azadi ka Amrit Mahotsav साईनगरीत हर मंदिर मज्जिद पर तिरंगा, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शिर्डीकरांचा ऐतिहासिक निर्णय

author img

By

Published : Aug 12, 2022, 6:11 PM IST

Sainagari Har Mandir Masjid Par Tiranga
साईनगरी हर मंदिर मज्जिद पर तिरंगा

देशाच्या अमृत महोत्सवी Azadi ka Amrit Mahotsav वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यानुसार साईनगरीत आजही सर्वधर्मीय एकदिलाने व गुण्यागोविंदाने नांदतात़ एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात़. त्याच भावनेतून देशाभिमान व श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदू-मुस्लीम बांधवानी सहर्ष सहमती दर्शवल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले. Indian Independence Day

शिर्डी / अहमदनगर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घरोघरी तिरंगा उपक्रम ( Indian Independence Day ) राबवण्यात येत आहे़. त्याचबरोबर जागतिक ओळख ( Azadi ka Amrit Mahotsav ) असलेल्या साईनगरीत विविध धर्मियांच्या सहयोगातून हर मंदिर मज्जिद पर तिरंगा हा ( Sainagari Har Mandir Masjid Tiranga ) अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असल्याच शिर्डीत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

साईनगरी हर मंदिर मज्जिद पर तिरंगा

बैठकीला मान्यवर उपस्थित शिर्डी नगरपंचायतमध्ये या संदर्भात झालेल्या बैठकीला कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब पारधी ( Balasaheb Pardhi ), मुख्यलिपिक रावसाहेब जावळे ( Chief Clerk Raosaheb Jawle ), जामा मज्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीनभाई इनामदार ( Jama Majjid Trust Shamshuddinbhai Inamdar ), रज्जाकभाई शेख, शफिक शेख, अजिम शेख, अमिर बादशा शेख, जैन काच मंदिराचे सतीश गंगवाल, श्वेतांबर जैन मंदिराचे फुटरमल जैन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भास्करराव गोंदकर, दत्तात्रय लुटे, म्हळोबा मंदिराचे प्रकाश शिंदे, ऋषीकेश साळुंके, सावता मंदिराचे सुधीर शिंदे, कानिफनाथ मंदिराचे संजय सजन आदींची उपस्थिती होते.

Independence Day in Sainagari....
शिर्डीकरांचा ऐतिहासिक निर्णय....

साईनगरीतील प्रत्येक मंदिर व मशिदीवर तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यानुसार साईनगरीत आजही सर्वधर्मीय एकदिलाने व गुण्यागोविंदाने नांदतात़. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात़. त्याच भावनेतून देशाभिमान व श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदू-मुस्लीम बांधवांनी सहर्ष सहमती दर्शवल्याचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितले़. साईबाबांनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवणूक दिली. त्याच तत्वानुसार येथील हिंदू- मुस्लिमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साईनगरीतील प्रत्येक मंदिर व मशिदीवर तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या निर्णयामुळे श्रद्धेला देशभक्ती व अभिमानाशी जोडले जाणार आहे. साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी साईसमाधी मंदिरावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी घेतला़. त्यापाठोपाठ शिर्डीतील हिंदू-मुस्लीम बांधवांनी शहरातील मंदिर-मशिदींवर तिरंगा उभारण्याचा निर्णय घेतला़. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे़. याच काळात शिर्डीतील मंदिर व मज्जिदवरही तिरंगा लावण्यात येणार आहे.


साई मंदिरात आकर्षक रोषणाई शिर्डी साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे साईभक्तीला देशभक्तीची सुवर्ण किनार लाभणार आहे. साईमंदिरावर 1952 साली साई मंदिराच्या कळसासाठी शिखर बांधल्यानंतर त्यावर रेशमी वस्त्रातील भगवा ध्वज उभारण्यात आला. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी साईमंदिरावर राष्ट्रीय सणांच्या दिवशी या ध्वजाबरोबरच राष्ट्रीय ध्वजही फडकवला जात असे. येत्या प्रजासत्ताक दिनी या इतिहासाची पुनर्रावृत्ती होणार आहे. साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व साईमंदिरात नयनरम्य फुलांची सजावटही करण्यात येणार असल्याचे साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले. केवळ अध्यात्म किंवा धार्मिकतेचा प्रचार-प्रसार न करता ग्रामस्थ व साईभक्तांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत राहावी. या उद्देशाने अगदी जुन्या काळापासून संस्थानचे कार्य सुरू आहे. त्याचाच परिपाक म्हणून संस्थानने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.


स्वातंत्र्यदिनी साईसंस्थानकडून मिरवणूक देश स्वतंत्र झाल्यानंतर साईसंस्थानकडून अनेक वर्षे राष्ट्रीय सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी साईमंदिरावर ध्वजारोहण, विद्युत रोषणाई करून सायंकाळी चक्क रथ मिरवणूकही काढण्यात येईल. त्यादिवशी कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत मंडळी व शालेय विद्यार्थ्यांना भोजन, गावातून मिरवणूक, भजन, कीर्तन, नाटक अशा कार्यक्रमांचेही आयोजन केले गेले होते.

समाधी मंदिराच्या गच्चीवर ध्वजारोहण पूर्वी समाधी मंदिराच्या गच्चीवर ध्वजारोहण सोहळा होत असे. नंतर वाढत्या गर्दीमुळे हा सोहळा सरंजाम बाग, लेंडीबाग व नंतर नवीन भक्तनिवास मागील पटांगणात स्थलांतरित झाला. 25 एप्रिल 1960 रोजी संसदेत महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची घोषणा झाल्यानंतर साई संस्थानने चार दिवस अगोदर 27 एप्रील 1960 रोजी साई समाधी मंदिरावरील गच्चीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम केला होता. या निमित्ताने मंदिरावर दिव्यांची आरास, अन्नदान, विविध खेळांच्या स्पर्धा, गायन, कीर्तन व रात्री रक्ताचे नाते या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.


हेही वाचा Khodashi Dam कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.