Rahul Dravid On Split Captaincy : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची विभाजित कर्णधारपदावर प्रतिक्रिया म्हणाले, मला...

author img

By

Published : Jan 24, 2023, 12:13 PM IST

Latest Cricket News

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सामावून घेतले जाणार नसल्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, कोहली आणि रोहितला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक देण्यात आला आहे. भारतीय संघातील वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी नव्या कर्णधारावर राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका इंदूरमधील शेवटच्या सामन्यानंतर संपणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. या टी-20 मालिकेसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाही. हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता भारतीय संघात वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार असेल, अशी चर्चा आहे. मात्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक : बीसीसीआयने राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मुख्य प्रशिक्षकाने या सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्यावर्षी टी-20 विश्वचषकातून टीम इंडिया उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यापासून विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या टी-20 कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी-20 संघात विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की कोहली, राहुल आणि रोहित शर्मा यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत ब्रेक देण्यात आला आहे.

खेळाडूंच्या कामावर लक्ष ठेवणार : दुखापती व्यवस्थापन आणि वर्कलोड व्यवस्थापन या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपण जेवढे क्रिकेट खेळतो, ते पाहता दोघांमध्ये समतोल राखला पाहिजे. यासोबतच आमचे मोठे खेळाडू मोठ्या स्पर्धांसाठी उपलब्ध आहेत याचीही खात्री केली जाईल. द्रविड यांनी सांगितले की, यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक यासारख्या मोठ्या स्पर्धा आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंसाठी कामाचा ताण खूप महत्त्वाचा असतो. बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यंदाच्या आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या कामावर लक्ष ठेवणार आहे.

संयम बाळगण्याची गरज : विभाजित कर्णधारपदावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नकार दिला. संघ वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांचे धोरण स्वीकारत आहे. द्रविड म्हणाला की, मला याची माहिती नाही. असे कोणाला वाटत असेल तर निवडकर्त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. त्याच महिन्यात द्रविड यांनी असेही म्हटले होते की, भारतीय टी 20 संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे आणि संयम बाळगण्याची गरज आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, मी टी-20 क्रिकेटमधील भविष्याबद्दल निर्णय घेतला नाही. आयपीएलनंतर याबद्दल विचार करु.

हेही वाचा : Sachin Tendulkar Favourite Shot: जेव्हा सचिन तेंडुलकर स्वतःच्या आवडत्या शॉटवर झाला होता आऊट.. केला मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.