ETV Bharat / sports

IPL 2022 LSG vs RR : खराब सुरुवातीनंतर ही आम्हाला विजयाची आशा होती - केएल राहुल

author img

By

Published : Apr 11, 2022, 3:14 PM IST

KL Rahul
KL Rahul

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( LSG captain Lokesh Rahul ) म्हणाला की, त्याच्या संघात असे फलंदाज आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा मार्ग बदलू शकतात. आमच्याकडे असा संघ आहे जो कधीही स्पर्धेबाहेर नसतो, असेही तो म्हणाला.

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 20 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Rajasthan Royals vs Lucknow Super Giants ) यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रोमांचक झालेल्या सामन्यात 3 धावांनी विजय ( Rajasthan Royals won by 3 runs ) मिळवला. हा राजस्थान रॉयल्सचा या हंगामातील तिसरा विजय होत. या सामन्यानंतर पराभव झालेल्या संघाचा कर्णधार केएल राहुलनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा रोमहर्षक सामना तीन धावांनी पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलने ( Lucknow Super Giants captain Lokesh Rahul ) रविवारी येथे सांगितले की, त्याच्या संघात असे फलंदाज आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामन्याची दिशा बदलू शकतात. इंडियन प्रीमियर लीगच्या या सामन्यात राजस्थानने 6 बाद 165 धावा केल्यानंतर लखनौचा डाव 8 बाद 162 धावांवर आटोपला. लखनौच्या संघाने 14 धावांत एक, दोन आणि नंतर तीन गडी गमावल्यानंतर सामन्यात शानदार पुनरागमन केले, परंतु ते लक्ष्यापासून तीन धावा दूर राहिले.

सामना संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात राहुल म्हणाला, 'आमच्याकडे असा संघ आहे जो कधीही सामन्यातून नसतो. सुरुवातीला तीन विकेट पडल्यानंतरही आम्ही विजयाचा विचार करत होतो. मधल्या षटकांमध्ये आम्हाला चांगल्या भागीदारीची गरज होती. अखेरीस मार्कस स्टॉइनिसने ( All-rounder Marcus Stoinis ) संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने 17 चेंडूत नाबाद 38 धावा करणाऱ्या मार्कस स्टॉइनिसला आठव्या क्रमवारीत पाठवण्याच्या निर्णयाचा बचाव करताना तो म्हणाला, 'स्टॉइनिसला नंतर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आमच्याकडे फलंदाजी करू शकणारे अनेक खेळाडू आहेत, मला ते कठीण वेळ पार करायची होती.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ( Rajasthan Royals captain Sanju Samson ) नवोदित वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचे अखेरच्या षटकात स्टॉयनिससमोर 15 धावांच्या बचावासाठी कौतुक केले. तो म्हणाला, 'सेनने पहिल्या तीन षटकांत चांगली गोलंदाजी केली. मी त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पाहिले होते. त्याच्याकडे चांगले कौशल्य आहे आणि तो भारतासाठी खेळू शकतो. वाईड यॉर्कर टाकण्याचा आत्मविश्वास त्याच्यात होता. त्याने सामनावीर युजवेंद्र चहल ( Man of the match Yujvendra Chahal ), ज्याने 41 धावांत चार बळी घेतले, त्याला सध्याचा सर्वोत्तम लेग-स्पिनर म्हणून घोषित केले.

हेही वाचा - Ipl 2022 Dc Vs Kkr : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 44 धावांनी विजय; वार्नर यादवचे दमदार प्रदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.