ETV Bharat / sports

U19 World Cup जिंकणाऱ्या टीम यंगिस्तानसाठी जय शाहंची 'मोठी' घोषणा, खेळाडूला मिळणार...

author img

By

Published : Feb 6, 2022, 7:56 AM IST

Updated : Feb 6, 2022, 9:21 AM IST

team india
team india

भारतीय संघाने अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप वर आपले नाव ( India Win Under 19 World Cup ) कोरले आहे. पाचव्यांदा भारताने अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर या खेळाडूंसाठी जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : भारताच्या यंगिस्तानने अंतिम सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत पाचव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप वर आपले नाव कोरले ( India Win Under 19 World Cup ) आहे. त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत मोठी घोषणा केली आहे.

जय शाह यांनी ट्विट करत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, "वर्ल्डकप विजेत्या प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्याला 25 लाखाचे बक्षीस जाहीर करताना मला आनंद आहे. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे," असेही जय शाह यांनी ( Jay Shah Announced 40 Lakh ) म्हटलं.

असा रंगला सामना

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 189 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघाने हे लक्ष 47.4 षटकांत पूर्ण केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत तंबूत गेला. इंग्लंडकडून जेम्स रियूने 95 धावांची झुंज दिली. तर, भारताकडून बावाने 5 विकेट्स घेत इंग्लंडच्या गडाला सुरुंग लावला. त्यासाठी राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

हेही वाचा - U19 World Cup Final 2022 : पोरं जिंकली...! भारताने पाचव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव; 4 गडी राखत इंग्लडचा धुव्वा

Last Updated :Feb 6, 2022, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.