ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs KKR : केकेआरविरुद्ध सामना गमावल्यानंतर, जसप्रीत बुमराहने दिली ही प्रतिक्रिया

author img

By

Published : May 10, 2022, 4:02 PM IST

Jaspreet Bumrah
Jaspreet Bumrah

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 56 वा सामना सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Kolkata Knight Riders vs Mumbai Indians ) संघात खेळला. हा सामना मुंबई इंडियन्स संघाने 52 धावांनी गमावला. त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) या हंगामातील 56 वा सामना सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Kolkata Knight Riders vs Mumbai Indians ) संघात खेळला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि केवळ 10 धावांत पाच विकेट घेतल्या. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकांत सर्वबाद 113 धावांत आटोपला. या पराभवानंतर जसप्रीत बुमराहने महत्वाची प्रतिक्रिया दिली.

बुमराहची ( Fast bowler Jaspreet Bumrah ) चमकदार कामगिरी व्यर्थ गेली आणि मुंबईचा 52 धावांनी दारूण पराभव ( KKR Beat Mi By 52 Runs ) झाला. केकेआरकडून झालेल्या दणदणीत पराभवानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Team ) आपल्या चुका सुधारेल आणि पुढच्या सत्रात जोरदार पुनरागमन करेल.

सामन्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, 'योगदान देणे नेहमीच चांगले वाटते, परंतु संघ जिंकणे हे महत्त्वाचे आहे. आम्हाला जिंकण्याची संधी होती, पण आम्ही ती गमावली. मी आकडेवारी आणि रेकॉर्डकडे लक्ष देत नाही. प्रक्रियेला चिकटून राहणे हे माझे मुख्य ध्येय आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून असेच होते.

जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, 'मी चांगल्या लयीत आलो, मीही चांगल्या लयीत गोलंदाजी केली. कधी कधी तुम्हाला विकेट मिळत नाहीत, पण हीच वेळ आहे जेव्हा तुमचा तुमच्या प्रक्रियेवर विश्वास असतो आणि मी तेच करत आहे. मी संघाला माझ्या क्षमतेनुसार मदत करू शकतो, कधी किफायतशीर गोलंदाजी करून तर कधी तुमचा दिवस असेल तर तुम्ही विकेट घेऊ शकता.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केकेआरविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ( Jaspreet Bumrah best bowling in IPL ) केली. त्याने 4 षटकात एका मेडनसह 10 धावांत पाच विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये बुमराहने एका डावात पाच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बुमराहने डावातील खास 18 वे षटक टाकले, जे क्रिकेट चाहत्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. या षटकात वेगवान गोलंदाजाने तीन विकेट घेतल्या आणि एकही धाव खर्च केली नाही. ही विकेट मेडन ओव्हर होती. अनिल कुंबळेनंतर ( Former bowler Anil Kumble ) जसप्रीत बुमराह हा आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळेने 5 धावांत 5 बळी घेतले होते.

हेही वाचा -Pakistan vs Sri Lanka : पाकिस्तान आणि श्रीलंका संघातील एकदिवसीय मालिका रद्द, जाणून घ्या काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.