ETV Bharat / sports

Ind vs Eng Test Series : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा झटका, 'या' कारणासाठी ठोठावला दंड

author img

By

Published : Jul 6, 2022, 12:04 PM IST

Ind
Ind

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारताला ( Ind vs Eng fifth Test Series ) पराभव स्विकारावा लागला. ज्यामुळे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर ही भारतीय संघाला एक झटका बसला आहे. भारताला मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला.

बर्मिंगहॅम: मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्याच्या मालिकेतील ( Ind vs Eng Test Series ) पाचवा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. ज्यामुळे मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. या सामन्यादरम्यान षटकाचा वेग कमी ठेवल्याबद्दल ( penalized for slowing down the over ) भारताला त्यांच्या मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात ( India fined 40 percent match fee ) आला. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन गुण कापले.

पाचव्या दिवशी, इंग्लंडने विक्रमी 378 धावांचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक असलेल्या 119 धावा आणि कसोटी इतिहासातील त्यांच्या सर्वोच्च-यशस्वी धावांचे आव्हान गाठले. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो ( Batsman Johnny Bairstow ) यांनी अनुक्रमे 142 आणि नाबाद 114 धावांच्या साथीने 269 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे इंग्लंडला पतौडी ट्रॉफीसाठीची मालिका 2-2 अशी बरोबरीत राखण्यात यश आले. ज्यामुळे भारताचे 2007 नंतर इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( International Cricket Council ) कडून अधिकृत प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे की, एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीचे डेव्हिड बून यांनी वेळ लक्षात घेऊन भारताला लक्ष्यापेक्षा दोन षटके कमी ठेवण्याचा निर्णय दिला. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठी, जे किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे, खेळाडूंना दिलेल्या वेळेत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

याशिवाय, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या खेळाच्या अटींच्या कलम 16.11.2 नुसार, संघाला प्रत्येक षटकाच्या शॉर्टसाठी एक पॉइंटचा दंड दिला जातो. परिणामी, भारताच्या एकूण गुणांमधून दोन WTC गुण वजा ( Subtract two WTC points from India ) करण्यात आले आहेत. दोन गुणांच्या पेनल्टीमुळे, आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानला मागे टाकून जो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉइंट पेनल्टीनंतर, भारत 52.08 टक्के गुणांसह 75 गुणांवर आहे, जे पाकिस्तानच्या 52.38 टक्के गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे.

हेही वाचा - IND vs ENG 5th Test : इंग्लंडचा भारतावर सात विकेट्सने विजय; पाच सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.