ETV Bharat / sports

Ind Vs Aus T20 : मॅक्सवेलचा दणका, ऑस्ट्रेलियाचा भारतावर ५ गडी राखून विजय; ऋतुराजचं शतक व्यर्थ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 3:18 PM IST

Updated : Nov 28, 2023, 10:49 PM IST

Ind Vs Aus T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी झालेल्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कांगारुंनी ५ सामन्यांच्या मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवलं.

Ind Vs Aus T20
Ind Vs Aus T20

गुवाहाटी Ind Vs Aus T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ नोव्हेंबर) गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवलं. मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियानं जिंकले होते.

भारताची प्रथम फलंदाजी : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच षटकात परतला. तो ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. तर ईशान किशान भोपळाही फोडू शकला नाही. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी भारताचा डाव सांभाळला. एका बाजूनं ऋतुराजनं तुफानी खेळी केली. त्यानं केवळ ५७ चेंडूत १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं १२३ धावा ठोकल्या. सूर्यकुमार ३९ धावा करून बाद झाला. तर तिलक वर्मा ३१ धावा करून नाबाद राहिला. भारतानं निर्धारित २० षटकांत २२२-३ धावा केल्या.

मॅक्सवेलची तुफानी खेळी : धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात वेगवान झाली. मात्र त्यांचे गडी नियमित अंतरानं बाद होत गेले. ट्रॅव्हिस हेडनं १८ चेंडूत ३५ धावा हाणल्या. तर अ‍ॅरॉन हार्डी १६ धावा करून बाद झाला. जोश इंग्लिसनं १० धावांचं योगदान दिलं. स्टॉयनिस २१ चेंडूत १७ धाव करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं जोरदार शतक ठोकलं. तो ४८ चेंडूत १०४ धावा करून नाबाद राहिला.

दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, अ‍ॅरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेटकीपर), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन

भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा

भारताचं मालिकेत वर्चस्व : रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतानं ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं चार गडी गमावून २३५ धावा केल्या. ही टी २० मधील पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडनंही अर्धशतकं झळकावली. यानंतर अखेरच्या षटकांत रिंकू सिंगनं ९ चेंडूत ३१ धावांची शानदार नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून शॉन अ‍ॅबॉटनं ३ षटकांत ५६ धावा दिल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ९ विकेट्स गमावून केवळ १९१ धावा करता आल्या.

हेही वाचा :

  1. भारताचा ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय, मालिकेत 2-0 अशी आघाडी
  2. धोनी आयपीएल २०२४ खेळणार! बेन स्टोक्सचा होणार लिलाव; जाणून घ्या संपूर्ण यादी
  3. भारताचा युवा 'प्रिन्स', गुजरातचा नवा कर्णधार; जबाबदारी घेताच काय म्हणाला गिल?
Last Updated :Nov 28, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.