नवी दिल्ली - जर त्यावेळी निर्णय पुनरावलोकन यंत्रणा (डीआरएस) असती तर माजी कर्णधार अनिल कुंबळेने कसोटीत ९०० बळी मिळवले असते, असे मत माजी सलामीवीर गौतम गंभीरने मांडले आहे. कुंबळेव्यतिरिक्त गंभीरने हरभजनसिंगचे कौतुक केले आहे.
गंभीर इन्स्टाग्रामवर बोलताना म्हणाला, “डीआरएसमुळे कुंबळेने आपली कारकीर्द ९०० पेक्षा जास्त आणि हरभजनने ७०० पेक्षा जास्त बळी घेऊन संपवली असती." कुंबळेच्या नावावर कसोटीमध्ये ६१९ बळी आहेत. शिवाय तो भारताकडून कसोटी क्रमवारीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. कसोटी सामन्यात हरभजनने भारताकडून ४१७ बळी घेतले आहेत.
गंभीरनेही कुंबळेच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. कुंबळेसारख्या कर्णधारासाठी आपण आपले आयुष्यही दिले असते, असे गंभीर म्हणाला आहे.