ETV Bharat / sitara

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ला ९ वर्षे पूर्ण, कलाकारांनी जागवल्या शूटिंगच्या आठवणी

author img

By

Published : Jul 15, 2020, 9:48 PM IST

Zindagi Na Milegi Dobara
'जिंदगी ना मिलेगी दोबारा'

जिंदगी ना मिलेगी दोबारा या हिट ब्लॉकबस्टर चित्रपटाला आज नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात परत जाण्याची ओढ सगळ्याच कलाकारांना जाणवते. झोया अख्तरसह सर्वच प्रमुख कलाकारांनी या चित्रपटाच्या आठवणी जागवल्या आहेत.

मुंबईः जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नवव्या वर्धापन दिनानिमित्त दिग्दर्शिका झोया अख्तर आणि कलाकार हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल आणि कॅटरिना कैफ यांनी चित्रपटाच्या आठवणी जागवल्या. या सिनेमाच्या शूटिंगचा काळ 'बेस्ट' होता असे त्यांनी म्हटले आहे.

15 जुलै २०११ रोजी रिलीज झालेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या रोड फिल्ममध्ये कल्की कोचेलिन, दीप्ती नवल आणि नसीरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सिनेमा बनविण्याच्या प्रवासाची आठवण करून देताना झोया म्हणाली की, ''जुन्या काळासाठी मला पुन्हा या चित्रपटाचे चित्रीकरण करायला आवडेल.''

"विश्वास ठेवू शकत नाही की, आता नऊ वर्षे झाली आहेत. मला त्या शूटचा प्रत्येक दिवस आठवतो. कलाकार आणि क्रूमधील माझ्या आवडत्या कलाकारांसोबत काम करणे माझ्यासाठी भाग्याचे होते., असे दिग्दर्शक झोयाने म्हटले आहे.

"मित्रत्वाची निर्मिती करा जी आयुष्यभर टिकेल, चित्रपट निर्माता म्हणून वाढेल .. आणि स्पेनशी प्रेमसंबंध बनले. जर मला गत काळात नेलं तर मी पुन्हा या शूटचा अनुभव घेण्याची निवड करेन!" दिग्दर्शक एका निवेदनात म्हणाले.

तिने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील पडद्यामागील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने, 'हे शूट खूप मिस करते', असे म्हटलंय.

तिच्या पोस्टवर कॉमेंट करताना ह्रतिकने लिहिलंय, "मला ओरडून सागावसं वाटत, आय लव्ह यू गाइज.!!! खरंच आतापर्यंतचा बेस्ट काळ होता."

"अरे! मी पुन्हा हा चित्रपट बनवतो आहे परत सेटवर परत या," असे अभय देओल पुढे म्हणाला.

फरहान म्हणाला की, गेली कित्येक वर्षे चित्रपटावर प्रेम असल्यामुळे तो प्रेक्षकांचा ऋणी आहे.

फरहानच्या पोस्टवर कॅटरिनाने टिप्पणी केली, "बेस्ट."

हेही वाचा - शकुंतला देवी ट्रेलर: गणिताची जादूगार म्हणून प्रेक्षकांना चकित करण्यासाठी विद्या बालन सज्ज

कलाकारांच्या प्रभावी अभिनयाशिवाय, संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांचे अलवार संगीत आणि झोया-फरहानचे वडील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे गीत, बार्सिलोना, पॅम्प्लोना, बुनोल यासारख्या स्पेनमधील नयनरम्य लोकेशन्ससाठी आजही या चित्रपटाची आठवण येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.