ETV Bharat / headlines

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील मानेची एनआयए कोठडी 1 मे पर्यंत वाढवली

author img

By

Published : Apr 29, 2021, 7:18 AM IST

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील माने
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील माने

मनसुखचा मोबाईल सुनील माने यांनी ताब्यात घेतला होता आणि त्याने तो ताबडतोब बंद केला, जेणेकरुन त्याला कोठे नेले जात आहे, हे कळले नसते.

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सुनील मानेची एनआयए कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली.

एनआयएने बुधवारी इन्स्पेक्टर सुनील माने यांना न्यायालयात हजर केले असता, एनआयएने सांगितले की सुनील माने 4 मार्च रोजी संध्याकाळी आपल्या कार्यालयात नव्हते, तर मनसुखची हत्या झाली तेव्हा ठाण्यात गेले होते.

एनआयएच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की 4 मार्च रोजी सुनील माने यांनी आपला मोबाइल बंद केला आणि तो आपल्या बॅगमध्ये ठेवला होता. तसेच ती बॅग त्याच्या कार्यालयात म्हणजे कांदिवलीच्या गुन्हे शाखेत ठेवली होती. यानंतर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्यास ती बॅग आपल्या घरी घेऊन जाण्यास सांगितले होते.

मनसुखचा मोबाईल सुनील माने यांच्याकडे

माने पुन्हा कळवा येथे गेले असता, सचिन वाझे यांनी मानेला त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर दोघे जण मुंब्राकडे निघाले आणि जाताना मनसुखलाही त्यांच्या गाडीत घेऊन गेले. मनसुखचा मोबाईल सुनील माने यांनी ताब्यात घेतला होता आणि त्याने तो ताबडतोब बंद केला, जेणेकरुन त्याला कोठे नेले जात आहे, हे कळले नसते.

त्यानंतर सुनील माने वसई येथे आले, जिथे तो मनसुखचा मोबाईल फोन सुरू केला, जेणेकरून भविष्यात जेव्हा मनसुखच्या हत्येचा तपास केला जाईल तेव्हा तपास करणार्‍यांना मनसूख वसईत सापडले किंवा मनसुख सापडला नाही या दृष्टीने तपास करतील.

एनआयएने म्हटले आहे की, या प्रकरणात त्यांना पुढील चौकशी करावी लागेल, सुनील माने यांना पुढील माहिती विचारली पाहिजे, या मागणीनंतर न्यायालयाने सुनील माने यांना १ मे पर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.