ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : प्रत्येक जागी भगवा झेंडा घेऊन फिरण्याची गरज नाही, राजमौलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली कंगना

author img

By

Published : Feb 18, 2023, 3:39 PM IST

Actress Kangana Ranaut Support To SS Rajamouli
संपादित छायाचित्र

बाहुबली आणि आरआरआर या चित्रपटामुळे राजामौली हे चांगलेच चर्चेत आलेआहेत. मात्र न्यूयार्क येथील मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजामौली नव्या वादात अडकले आहेत. राजामौली यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीका आहे. मात्र त्यांच्या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी कंगना राणावत मैदानात उतरली आहे. प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा घेऊन फिरण्याची गरज नसल्याचे कंगनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई : आरआरआर या सुप्रसिद्ध चित्रपटामुळे चित्रपट निर्माते एस एस राजमौली हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला अमेरिकेतील डायरेक्टर गिल्ड ऑफ यूएस हा पुरस्कारही मिळाला आहे. मात्र आता राजामौली नव्या वादात अडकले आहेत. न्यूयार्क येथे गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी धर्मावर भाष्य केल्याने त्यांच्यावर टीक करण्यात येत आहे. मात्र या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी बॉलिवूड क्विन कंगना राणावत मैदानात उतरली आहे. राजामौली विरोधात आपण काहीच सहन करु शकमार नसल्याचे तिने टीकाकारांना सुनावले आहे.

काय आहे राजामौली विवाद प्रकरण : एस एस राजामौली हे न्यूयार्क येथील गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी न्यूयार्क येथील एका मुलाखतीत एस एस राजामौली यांनी धर्मावर भाष्य केले होते. मी अगोदर खूप धार्मीक होतो. आता मात्र तितका नाही. मात्र मी नास्तीकही झालो नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. रामायण आणि महाभारतावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. त्यासह आरआरआर हा चित्रपट दक्षिण भारतातील आहे. त्याच दक्षिण भारतातून मी येतो असेही त्यांनी यावेळी सांगतिले. त्यामुळे हा बॉलिवूडचा चित्रपट नाही, तर दक्षिण भारतीय चित्रपट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बॉलिवूड विरुद्ध दक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरू झाला. त्यामुळे एस एस राजामौली यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल माध्यमात त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे चांगलाच वाद ओढवला आहे.

राजामौलीच्या समर्थनार्थ कंगना उतरली मैदानात : बाहुबली आणि आरआरआर या सुप्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते एस एस राजामौली यांच्यावर सोशल माध्यमातून चांगलीच टीका करण्यात येत आहे. त्यावर बॉलिवडची क्विन कंगना राणावतने टीकाकारांना चांगलेच फैलावर घेतले आहे. राजामौली यांच्या विरोधात काहीही बोललेले मी खपवून घेणार नसल्याचा इशाराच कंगनाने टीकाकारांना दिला.

भगवा झेंडा सगळीकडे फरिवण्याची गरज नाही : एस एस राजामौली यांनी केलेल्या भाष्यावर चांगलीच टीका होत आहे. मात्र त्यांच्या या टीकाकारांना बॉलिवूडची क्विन कंगना राणावतने चांगलेच उत्तर दिले आहे. सगळीकडे भगवा झेंडा घेऊन मिरवण्याची गरज नसल्याचे कंगनाने म्हटले आहे. एस एस राजामौली यांचे हिंदूत्व सगळ्यांना माहिती आहे, असेही कंगनाने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे राजामौली यांच्यावर टीका करण्याची गरज नसल्याचेही कंगणाने स्पष्ट केले.

हेही वाचा - Project K Release Date Out : प्रभासचा बहुचर्चित प्रोजेक्ट के चित्रपटाचा मुहुर्त ठरला, या तारखेला होणार रिलिज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.