ETV Bharat / city

परीक्षा वारंवार रद्द होण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अन्यथा..फडणवीस यांचा इशारा

author img

By

Published : Sep 25, 2021, 8:14 PM IST

fadnavis talk on health department exam
आरोग्य विभाग परीक्षा देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया

आरोग्य विभागाच्या परीक्षा वारंवार रद्द होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा. अन्यथा आम्ही आंदोलन छेडू, असा इशारा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

नवी मुंबई - आरोग्य विभागाच्या परीक्षा वारंवार रद्द होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा. अन्यथा आम्ही आंदोलन छेडू. तसेच, या आरोग्य विभागात काही दलाल सक्रिय झाले आहेत व लाखो रुपये घेऊन काम करत आहेत. दलालांमुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - ठाण्यातील बंद वॉटर पार्कमध्ये घुसली मगर

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल, तसेच नुकसान होत आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, या अगोदर स्वतः आरोग्य मंत्र्यांनी फेसबुकवर लाइव्ह करत परीक्षा रद्द होणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर विद्यार्थी या परीक्षेसाठी आले, त्यांचे पैसे खर्च झाल्यावर त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे कळते हे अंत्यत चुकीचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पसरत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले. तसेच, अशा गोष्टींमुळे या सरकारमध्ये नक्की काय सुरू आहे, हेच कळत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

प्रवेश पत्रात देखील घोळ

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रात देखील चांगलाच घोळ पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांना राज्याच्या बाहेरील प्रवेश पत्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला, असेही फडणवीस म्हणाले.

आरोग्य विभागाच्या पदांसाठी दलाल सक्रिय

आरोग्य विभागाच्या पदांसाठी दलाल सक्रिय झाले असून, या पदांसाठी दलाल पाच ते दहा लाख रुपये घेत आहेत, असाही घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. हे दलाल नक्की कोण आहेत? याचीही चौकशी झाली पाहिजे. या दलालांच्या बाबतीत आमच्याकडे अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे प्रकार बंद झाले पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.