ETV Bharat / city

मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र

author img

By

Published : Oct 8, 2021, 8:13 PM IST

Updated : Oct 8, 2021, 8:32 PM IST

नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. मात्र मोदी सरकार या सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहे. मला ईडीची नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र जनतेने यांना वेडी ठरवले, असे सांगत शरद पवार यांनी केंद्रावर टीका केली.

शरद पवार
शरद पवार

सोलापूर - ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सर्व जनतेला दिसत आहे. देशातील रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. नेहरूंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर देण्यात आला. मात्र मोदी सरकार या सर्व गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहे. मला ईडीची नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र जनतेने यांना वेडी ठरवले, असे सांगत शरद पवार यांनी केंद्रावर टीका केली. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली.

हेही वाचा - हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका

'हत्येचा गुन्हा व्हावा'

शेतकरी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यामध्ये 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेस जबाबदार असणाऱ्या संशयित आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कठोर शासन त्यांना झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

शरद पवार

'सरकारी पाहुण्यांची चिंता नाही'

मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यावर ते म्हणाले, की सरकारी पाहुण्यांची आम्हाला कधीच चिंता नाही. तसेच माझा काही संबंध नसलेल्या बँकेशी मला जोडून ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर जनतेने भाजपाला वेडी ठरवले.

हेही वाचा - शेतकऱ्यांना चिरडले गेल्यानंतरही पंतप्रधानांचे मौनच! मात्र, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही -सुप्रिया सुळे

काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील विजयाताई पाटील या बहिणीच्या ऑफिस व घरी आयकर विभागाने छापा टाकला. 7 आणि 8 ऑक्टोबरला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये दाखल होऊन झाडाझडती घेतली. विजयाताई मोहन पाटील यांच्या घरावर आणि ऑफिसवर गुरुवारी आयकर विभागाने गुरुवारी छापा टाकला होता. गुरुवारी दिवसभर कागदपत्र आणि माहिती घेण्याचे काम जवळपास दहा अधिकाऱ्यांच्या पथकाकडून सुरू होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

Last Updated :Oct 8, 2021, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.