ETV Bharat / city

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

author img

By

Published : Jun 8, 2022, 11:48 AM IST

12 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देखील कोकण विभागाचा निकाल हा 97.21 टक्के सर्वाधिक आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. यंदा देखील 12 वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.35 टक्के लागला आहे.

बारावीचा निकाल जाहीर
बारावीचा निकाल जाहीर

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 12 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देखील कोकण विभागाचा निकाल हा 97.21 टक्के सर्वाधिक आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभगाचा 90.91 टक्के लागला आहे. यंदा देखील 12 वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.35 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल हा 93.29 टक्के लागला आहे अशी माहिती महारष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोरोना नंतर ऑफलाईन पद्धतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४ मार्च २०२२ ते ०७ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.त उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा 1356604 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये -

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४४९६६४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४३९७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३५६६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.
३. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.२१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९०.९१%) आहे.
४. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९५.३५ असून विद्यार्थ्यांचा निकाल ९३.२९ आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यापेक्षा २.०६% ने जास्त आहे.
५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६३३३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६००१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९५.२४ आहे.
६. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्याथ्र्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
७. एकूण १५३ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० % आहे.
सन २०२१ मध्ये कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता.फेब्रु मार्च २०२० चा निकाल ९०.६६ टक्के इतका होता. मार्च-एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के आहे. त्यामुळे फेब्रु-मार्च २०२० च्या तुलनेत या वर्षी निकाल ३.५६ टक्के वाढला आहे.

९. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३३७९५ एवढी असून (३३२३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९१०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८७.५६ आहे.

शाखानिहाय निकाल - यंदा विज्ञान शाखेचा निकाल हा 98.30 टक्के तर कला शाखेचा निकाल 90.51 टक्के,वाणिज्य शाखेचा निकाल हा 91.71 टक्के लागला आहे.व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल हा 92.40 टक्के आणि आय. टी.आय विभागाचा निकाल हा 66.42 टक्के लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.